महाराष्ट्र बॅंक ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांनी ठोकला बॅंके जवळच तळ, सावखेडा व वाणेगाव येथील खाते धारकांची आर्व्यथिक व्यवहार करण्यासाठी धावपळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२३
बँकेच्या खाते धारकांना बँकेकडून चांगल्या सुविधा देण्यासाठी विविध बँकांनी ए. टी. एम. तसेच गावागावात ग्राहक सेवा केंद्र देऊन वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामागील हेतू म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात बँकेच्या खेडेगावातील बॅंकेच्या खातेदारांना कुठलीही धावपळ न करता किंवा घरापासून बँकेपर्यंत जाण्या, येण्यासाठी वाहन व्यवस्था वेळेवर मिळत नसल्याने तसेच वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व अंध नागरीक, महिलावर्जाग, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना येण्या, जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच आर्थिक झळ न बसता दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून जागेवरच बॅंकेतून पैसे काढणे, पैसे जमा करणे किंवा पैसे पाठवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देत मोठ्या लोकसंख्येच्या गावातील बॅंक खातेदारांना गावातच सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता बॅंकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावागावात सुशिक्षित बेरोजगारांना दोन पैसे कमावण्यासाठीचा दुहेरी हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध करून दिले आहेत.
परंतु पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्र संचालकांकडून बॅंकेच्या नियमांची पायमल्ली होत असून बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र घेतांना ठरवून दिलेल्या गावातच त्यांनी आपले ग्राहक सेवा केंद्र चालवून गावातील बॅंक खातेदारांना गावातच सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे असा नियम असल्यावरही बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्र संचालकांकडून मनमानी कारभार सुरु असल्याच्या तक्रारी बॅंकेच्या ग्राहकांनी सत्यजित न्यूज कडे कथन केल्या असून वरखेडी महाराष्ट्र बॅंक शाखेच्या सावखेडा व वाणेगाव येथील ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांनी आपल्या मर्जीप्रमाणे वरखेडी महाराष्ट्र बॅंकेच्या समोरच असलेल्या जामनेर ते पाचोरा रस्त्यावर अतिक्रमित जागेवर ग्राहक सेवा केंद्र सुरु केले आहे.
यामुळे सावखेडा व वाणेगाव येथील महाराष्ट्र बॅंकेच्या खातेदारांना बॅंकेतून पैसे काढणे, बॅंकेत पैशांचा भरणा करणे व इतर व्यवहार करण्याची सहा, सहा किलोमीटर प्रवास करुन आपले व्यवहार करावे लागत आहेत. यामुळे बॅंकेच्या खातेदारांना हाताचे काम सोडून प्रवासखर्च करुन किंवा पायंदळी ऊन, वारा, पावसात धावपळ करावी लागत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (विशेष म्हणजे सावखेडा व वाणेगाव येथील ग्राहक सेवा केंद्र ही महाराष्ट्र बॅंकेच्या समोरच व जामनेर ते पाचोरा रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी एकच गर्दी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.)
म्हणून महाराष्ट्र बॅंकेचे वरखेडी शाखेचे व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांना रितसर लेखी स्वरुपात नोटीस बजावून बॅंकेच्या अटी व नियमाप्रमाणे बॅंकेच्या समोरच सुरु असलेली ग्राहक सेवा केंद्र ही त्यांच्या नमूद केलेल्या गावात घेऊन जाण्यासाठी भाग पाडावे म्हणजे बॅंकेच्या खातेदारांना आपापल्या गावात सुविधा उपलब्ध होईल व आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिव्यांग, अंध, वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक व महिलावर्गासह विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.