दवंडी न देताच ग्रामसभेचे आयोजन, वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे ग्रामस्थांचा आक्षेप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायतीचा सन २०२३ ते सन २०२८ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुक कार्यक्रामाच्या पहिल्या टप्प्यात “वार्ड आरक्षण” चे नियोजन करण्याकरिता दिनांक २१ जून २०२३ बुधवार रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु वडगाव आंबे ही ग्रुप ग्रामपंचायत असून यात कोकडी तांडा व वडगाव जोगे या दोन ताड्यांचाही समावेश असल्याने “वार्ड आरक्षण” चे नियोजन करण्यासाठी ग्रामसभा घेण्याकरिता निदान दोन दिवस अगोदर वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे या गावातून ग्रामस्थ घरी असतात त्या वेळात म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी (दवंडी) म्हणजे जाहीर निवेदन देणे गरजेचे होते .
असे असतांनाही वडगाव आंबे येथील ग्रामपचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक मा. श्री. म्हस्के आप्पा यांनी (दवंडी) म्हणजे जाहीर निवेदन न देता ग्रामपचायतीवर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यामार्फत सोशल मीडियावर खालील प्रमाणे संदेश टाकून दिनांक २१ जून २०२३ बुधवार रोजी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतल्यामुळे वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत “वार्ड आरक्षण” निश्चित करण्याकरिता (दवंडी) जाहीर निवेदन देऊन पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
कारण फक्त सोशल मीडियावर संदेश टाकून ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले मात्र गावातील प्रत्येक ग्रामस्थांजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही व ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल आहे त्यापैकी बऱ्याचशा ग्रामस्थांना व्हाट्सअपचे ज्ञान नाही व विशेष म्हणजे ज्या व्हाट्सअप ग्रुपवर ग्रामसभा घेण्यात येणार आहे असा संदेश टाकण्यात आला होता त्या व्हाट्सअप ग्रुप वर गावातील प्रत्येक नागरिक सदस्य नसल्याने गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभा असल्याबाबत संदेश न मिळाल्याने गावातील जवळपास नव्वद टक्के लोक या ग्रामसभेबाबत अनभिज्ञ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणून दोन दिवस अगोदर वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे या गावातील गल्लीबोळात (दवंडी) म्हणजे जाहीर निवेदन देण्यात येऊन पून्हा ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी तिघही गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
(प्रशासकीय अधिकारी मा. श्री. धस साहेब यांचा खुलासा)
आज ग्रामसभा घेण्यात येत आहे याबाबत मला काहीच माहीत नव्हते काही काही वेळापूर्वी मला फोन आल्यावर ग्रामसभा घेण्यात येत असल्याचे कळाले असा खुलासा प्रशासकीय अधिकारी मा. श्री. धस साहेब यांनी सत्यजित न्यूजशी बोलतांना दिला आहे.