पिंपळगाव हरेश्वर येथे ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग दर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०३/२०२२
ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग दर्शन व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव हरेश्वर येथील माळी समाज मंगल कार्यालयात दिनांक ६ मार्च रविवार ते ९ मार्च २०२२ बुधवार पर्यंत करण्यात आले होते. हा कार्यक्रम पूर्ण सप्ताह अखंडपणे सुरु होता. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे श्रीमद्भगवद्गीता परमात्मने दिलेले जे श्रेष्ठ मत आहे त्याची आठवण ठेऊन आपण आपल्या जीवनात प्रत्येक कर्म करतांना कसा करावा हे सांगण्याचा यामागचा हेतू होता.
तसेच बरेचसे भाविक, भक्त बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठ भारतात प्रत्येक ठिकाणी जातो. यामागे आपली श्रेष्ठ भावना असते, श्रद्धा असते पण कदाचित कोणाकडे वेळ नसतो. कदाचित प्रत्येकाकडे पैसा नसतो यामुळे सगळ्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे शक्य नसते म्हणून सगळ्या भाविकांनी इथे येऊन एकाच वेळेला एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग दर्शन करावं आणि परमात्मा हा निराकार आहे. ज्योती बिंदू स्वरूप आहे त्याचा असा माणसात नाहीये तो सगळ्यांचा आहे. सगळे आत्म्यांचा सर्व धर्माचा सगळ्या जातीच्या सगळ्या विश्वातल्या सगळ्या लोकांचा तो पीता आहे हा यामागचा हेतू आहे.
याचमुळे आपण म्हणतो की सबका मालिक एक है, हा आता अंतिम समय बदललेला आहे. हे सगळे सगळे दाखवत सुद्धा आहेत. अशा वेळी अनेक घटना आपल्या जीवनात येत आहेत. तसे बघितला तर भारत हा कृषी प्रधान देश आहे. तिथे सुद्धा अडचणी येत आहेत. मग जेव्हा संकट किंवा दुःखाचे वातावरण आहे. अशा वेळी परमात्मा आपल्याला जीवन कासे जगवे असा संदेश देत आहे. परमात्म्याची आठवण करून आपण शांती, सुख, आनंद व पवित्रता या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून आपली खरी शक्ती आत्मसात करुन परमात्म्याची आठवण करत ध्यान केल्याने समज मिळते. की जी परिस्थिती आपल्यासमोर आहे. त्या परिस्थितीला तोंड कसे द्यावे.
तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या विचारांनी वागत असते, म्हणून सगळे आपल्या मनाप्रमाणे वागतील व सगळे आपल्या मनाप्रमाणे होईल असे नाही. म्हणून जो जसा आहे त्याला त्या रूपात स्वीकार करणं हे महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण जीवनात एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेला आणि त्यानंतर आपण स्वतः बद्दल विचार करतो की कधीकधी कोणामध्ये कॉन्फिडन्स नसतो म्हणून आपण हे करू शकत नाही, आपल्याला करता येणार नाही पण परमात्म्याचे ज्ञान देतात त्याच्यासाठी आपल्याला आपला सन्मान आपल्यातले कॉलिटीत आहे. त्याचा डेव्हलप करण्यासाठी हे राज योग मेडिटेशन आहे. ते खूप मदत करतात, लोकांमध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
आपण या धर्तीवर आलो आपले मनुष्य जीवन हे उत्तम, उत्तम व्हावे आणि प्रत्येकाने आपला व्यवहार सांभाळून शांतीचा अनुभव करावा आणि परमात्म्याला आठवण करून आपल्या जीवनाचे सार्थक करावं हा यामागचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ब्रम्हकुमारी ललिता दिदी. (संचालिका ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, पिंपळगाव), ब्रम्हकुमारी प्रांजल दीदी.(राजयोग शिक्षिका,
संचालिका,सामनेर) ब्रम्हकुमारी अश्विनी दिदी. (राजयोग शिक्षिका
रथ चौक,जळगाव) यांनी अथक परीश्रम घेतले.