निपाणे प्रकरणातील आरोपी अटकेस होत असलेल्या विलंबनाबाबत पाचोऱ्यात आक्रोश मोर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२२
पोलिस प्रशासनाने कीतीही पळवाटा काढल्या तरी सुप्रिम कोर्टापर्यंत न्यायासाठी लढा देऊ अॅड.रोहित ब्राम्हणे
आजपर्यंत १२ दिवस झाले तरी पोलिस प्रशासन निपाणे येथिल मानवतेला काळीमा फासणार्या घटनेतिल आरोपींना आटक करत नाहीत. ते कुणाच्यातरी दबावाखाली काम करीत असले तरी न्याय मार्गाने न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंतही जाऊ असा इशारा अॅड.रोहित ब्राम्हणे यांनी पोलिस प्रशासनासह दिला.
आज निपाणे गावातिल घडलेल्या घटनेतिल आरोपींना अटक करण्यासाठी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी “तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय” या घोषणेने दोन जातित तेढ निर्माण करण्याचा आरोप करणाऱ्या दलित संघटनांनी एकजुटिने चोख उत्तर दिले.
तालुक्यातिल निपाणे येथे दिनांक १२ सप्टेंबर सोमवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका दलित समाजाच्या मृत महिलेचा अंत्यविधी गावातील स्मशानभूमीमध्ये होवु देण्यास माजी जिल्हापरिषद सदस्य तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांनी मज्जाव केल्याची घटना घडली होती. दरम्यान दिनांक १४ सप्टेंबर बुधवार रोजी रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आज १६ दिवस उलटुनही संशयित आरोपींना अटक करण्यात आली नसुन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मागणीसाठी दिनांक २६ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरी समाज, सामाजिक संघटना तसेच निपाणे गावातील ग्रामस्थांच्यावतीने शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आक्रोश मोर्चा काढला आला.
या मोर्चात सहभागी झालेल्यांनी संशयीत आरोपींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशा मागणीने परिसर दणाणून सोडला होता. मोर्चात समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, अॅड. अविनाश भालेराव, प्रविण ब्राम्हणे, मा. नगरसेवक खंडु सोनवणे, समाधान धनुर्धर, विकी जगताप, सुनिल शिंदे, विशाल बागुल, रविंद्र सोनवणे, समाधान संसारे, बाळु धनुर्धर, दिगंबर धनुर्धर, भगवान भालेराव, शंकर सोनवणे, दिपक सोनवणे, गोपाल धिवरे, सागर अहिरे, अर्जुन सोनवणे, संतोष खैरे, विश्वनाथ अहिरे, सुनिल कदम, नामदेव शिरसाठ, भिमराव लहासे, दशरथ धनुर्धर, भाऊराव सोनवणे, प्रदिप जाधव सह मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच निपाणे येथील मृत महिलेचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आक्रोश आंदोलनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना किशोर डोंगरे यांनी मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ असुन आमचा लढा समाजा विरूध्द नसुन वृत्ती विरूध्द असल्याचे सांगितले.अॅड.रोहित ब्राम्हणे यांनी पोलिस प्रशासनाची सुरू असलेली चालढकलचा कायद्याच्या भाषेत कायद्याच्या चौकटित समाचार घेत येणाऱ्या काळात पोलिस प्रशासन आज करित असलेल्या चुका त्यांना किती माहगात पडतिल हे इशारा देउन सांगितले.यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.