वडगाव आंबे येथील तलाठ्याचे कामकाज व्हेरी फाइन, ५०० रुपयांची लाचही स्विकारली ऑनलाईन.
दिलीप जैन (पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२१
(वडगाव आंबे तलाठी कार्यालयाचे कामकाजात ऑनलाईन पध्दतीचा शंभर टक्के वापर होत असल्याने या तलाठी कार्यालयातील कार्यरत असलेल्या तलाठी आप्पांचे कारवाई करुन कौतुक होणार असल्याचे समजते.)
जे नाही ललाटी ते देतो तलाठी अशी एक म्हण प्रचलित आहे . मनुष्याचा जन्म झाल्यानंतर पाचवीच्या दिवशी पाचवीचे पूजन केल्यानंतर त्या पूजनाच्या ठिकाणी एक कोरा कागद व हळकुंड म्हणजे हळदीचा तुकडा ठेवला जातो. पाचव्या दिवशी सटवी देवी आपल्या घरात जन्मलेल्या बाळाचे भविष्य लिहिते असा एक समज आहे.
परंतु त्यापेक्षाही पुढचे पाऊल आज-काल महसूल विभागातील (काही) तलाठ्यांनी टाकले आहे. तलाठी म्हणजे ज्या भागात ते कार्यरत असतील त्या भागाचा तो शिवाराचा मालक म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतीत अल्पशा फायद्यासाठी दुसऱ्याच्या नावाचे पिक पेरा लावणे, वारस लावणे, वारस काढणे, भोगवटदार दाखवणे, शेती रस्त्यात फेरबदल करणे, ड पत्रकाच्या नोंदीत हेराफेरी करणे, अधिकार नसतांना वाटणी करणे व इतर कामांसाठी उतारे देताना हेराफेरी करणे उतारे देण्यासाठी व विविध नोंदी करण्यासाठी शासकीय नियम तोडून मनमानी करत जास्तीचे पैसे घेणे असे प्रकार हे तलाठी राजरोसपणे करत असतात.
परंतु वडगाव आंबे येथील तलाठी श्री. युवराज बाबूलाल पाटील. यांनी कमालच केली आहे. व त्यांच्या कमालीचे कौतुक तक्रारी अर्जाव्दारे सर्वसाधारण नव्हे तर पेशाने वकील असलेले शेतकरी अॅड. मा.श्री. मंगेश गायकवाड यांनी पाचोरा उपविभागीय अधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे याच्याकडे यांच्याकडे केले असून चौकशीची मागणी करत संबंधित तलाठ्यास निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे पैसे घेताना तलाठी आप्पा यांनी कोणतीही लाज-शरम किंवा कायद्याचा धाक न बाळगता ऑनलाइन पद्धतीने गुगल पे द्वारे ५००/०० रुपये लाच स्वीकारली असून संबंधित शेतकऱ्याने मा.उपविभागीय अधिकारी साहेब पाचोरा यांच्याकडे पुरावा सादर केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वडगाव आंबे शिवारात अॅड.मा.श्री. गायकवाड यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या वडगाव आंबे शिवारातील गट नंबर ८० वरील नोंद नंबर १८७८ ची नक्कल मागीतली होती. परंतु ती नक्कल देण्यासाठी तलाठी युवराज पाटील यांनी ५००/०० रुपयांची मागणी केली व पैसे दिल्याशिवाय नक्कल मिळणार नाही. असे हुकुमशाही पध्दतीने संबधित शेतकऱ्याला सांगितले त्यांनी पैशाची मागणी करताच मंगेश गायकवाड यांना ही बाब खटकली परंतु म्हणतात ना गरजवंताला अक्कल थोडी असते असाच काहीसा प्रसंग गायकवाड यांच्यावर ओढवला होता कारण पिक कर्ज घेणे महत्त्वाचे होते त्याशिवाय बि,बियाणे घेणे शक्य नसल्याने मंगेश गायकवाड यांनी माझ्याकडे हातात सध्या पैसे नाहीत असे सांगितले तेव्हा तलाठी यांनी फोन पे व्दारे पैसे दिले तरी चालतील असे सांगितले व पैसे मिळाल्याशिवाय काम होणार नाही असे सुचत केल्यानंतर अॅड.मा.श्री.मंगेश गायकवाड यांनी त्यांच्या ८९९९३९९५८५ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून तलाठी युवराज पाटील त्यांच्या ९४०४३४७६१५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर १३ जुलै मंगळवार रोजी ११वाजून ३८ मिनीटांनी फोन पे या मोबाईल तलाठी युवराज पाटील यांच्या फोन पे वर ५००रुपये पाठवले.
ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याची त्यांनी खात्री केल्यानंतर तलाठी आप्पांनी मागणीप्रमाणे १८७८ ची प्रमाणित नक्कल दिली असे अॅड. मा.श्री.मंगेश गायकवाड यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
परंतु पत्नीच्या स्वमालकीच्या शेताची अधिकृत नक्कल काढण्यासाठी गरज नसतांना अनाधिकृत पणे पैसे देणे म्हणजे एकप्रकारे (लाच) देणेच आहे. व लाच देऊन काम करण्याबद्दल कायद्याच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व कायदा मानणाऱ्या अॅड.मा.श्री. मंगेश गायकवाड यांना ते मान्य नसल्याने त्यांनी याबाबत त्वरित मंडळ क्षेत्राचे अधिकारी मा. श्री.वरद वाडेकर यांना दूरध्वनीवरून तक्रार दिली. तेव्हा त्यांनी मी दोन-तीन दिवसात चौकशी करतो तोपर्यंत कोणतेही पाऊल उचलू नका याबाबत मी तुम्हाला सोमवारी १९ रोजी अवगत करतो असे सांगितले होते.
म्हणून अॅड.मा.श्री. मंगेश गायकवाड हे मंडल अधिकारी यांच्या निर्णयाची वाट पहात असतांनाच सोमवारी मंडळ अधिकारी यांनी सांगितले की मी तलाठी युवराज पाटील यांना समजावले मात्र सदरचे तलाठी माझे ऐकत नाहीत त्यामुळे तुम्हाला काय कारवाई करायची ती तुम्ही आता करू शकतात असे सूचीत केले. म्हणून मंगेश गायकवाड यांनी दिनांक १९ जुलै सोमवार रोजी मा.उपविभागीय अधिकारी साहेब पाचोरा व तहसीलदार साहेब यांच्याकडे गांभीर्याने तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती.
या तक्रारीबाबत तलाठी युवराज पाटील यांना ज्ञात झाल्यावर त्यांनी गावातील राजकीय व्यक्तींना मध्यस्थी करायला सांगून अॅड.मा.श्री. गायकवाड यांच्यावर अनावश्यक दबाव आणला मात्र मंगेश गायकवाड यांना गोरगरीब जनतेला लूटणाऱ्या या मगरुर तलाठ्यावर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तक्रार मागे घेणार नाही असे सांगितले. त्यामुळे सदर तलाठी यांनी मंगेश गायकवाड यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने घेतलेले ५०० रुपये मंगेश गायकवाड यांची कोणतीही संमती नसतांना किंवा कोणतेही बोलणे झाले नसतांना ५०० रुपये फोन पे ॲपद्वारे परस्पर जमा केल्याची माहिती मंगेश गायकवाड यांना ८९९९३९९५८५ या क्रमांकाचे भ्रमणध्वनीवर वर आलेल्या संदेशा मुळे समजले म्हणजेच तलाठी युवराज पाटील यांनी नोंद व प्रमाणित नक्कल देण्यासाठी पाचशे रुपये स्वीकारल्याचे त्याने स्वताच सिद्ध करुन दिले असल्याने यासाठी वेगळ्या चौकशीचे आवश्यकता दाखवून वेळेचा अपव्यय करणे ऐवजी अश्या भ्रष्ट तलाठ्यास तात्काळप्रभावाने निलंबित करावे व नंतर त्यांची सविस्तर चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
तसेच आपण याप्रमाणे न केल्यास लाचखोर लोकसेवकास सहाय्यक केल्यासारखे होईल तरी दिरंगाई होणार नाही याची काळजी घेत वडगाव येथील तलाठी युवराज पाटील यांच्यावर त्वरित खडक कारवाई करावी व यासाठी आपण प्रस्तावित कराल चौकशी समय मला वेळोवेळी हजर राहण्यात स्वतंत्ररीत्या अवगत करावे अशी विनंती अॅड.मा.श्री. मंगेश गायकवाड यांनी तक्रारी अर्जात केली आहे.