“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी “. सगळीकडे गाजत आहे तालाठोक, हल्लाबोल आंदोलन, मात्र अद्यापही राणे कुटुंबीयाचे कुणीही केले नाही सात्वन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२१
शेळी जाते जीवानिशी आणि खाणार म्हणतो वातट कशी
एखाद्या मनुष्याने खूप जीव तोडून एखादी गोष्ट दुसऱ्याला संतोष देण्याकरितां करावी पण त्याबद्दल त काहीच वाटूं नये, अशा स्थितीत ही म्हण वापरतात.
अशीच परिस्थिती एक कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित असलेले विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी जे आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्नात असलेले व आज आपल्यातून अकस्मात निघून गेलेले स्व.गजानन राणे यांच्या बाबतीत अनुभवायला येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिनांक ०७ जून सोमवारी पाचोरा व भडगाव तालुक्यात तालाठोक-हल्लाबोल आंदोलन केले त्यावेळी भडगाव येथील महावितरण कार्यालयात काही संशयित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड करत अभियंता श्री.अजय धामोरे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यात स्व.गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
परंतु घटना घडून सात दिवस झाले या सात दिवसात सत्ताधारी आंदोलन कर्ते व विरोधीपक्ष यांच्यात कलगीतुरा सुरु असून स्व.गजानन राणे यांच्या मारेकऱ्यांना शोधून कठोर शासन व्हावे म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे अमोलभाऊ शिंदे यांनी आजच पत्रकार परिषदेत काही संशयित आरोपी पकडले आहेत मात्र या मागचा कर्ता,करविता धनी दुसराच असून त्याचा शोध घेऊन कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
एका बाजूला ह्या घटना घडत असतांनाच दुसरीकडे दुसऱ्याचे घर सतत प्रकाशमान रहावे म्हणून झटणारे मनमिळाऊ स्वभावाचे असलेले कर्तव्यदक्ष कर्मचारी स्व.गजानन राणे यांच्या घरात मात्र कायमस्वरूपी अंधार झाला आहे.
राणे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असल्यावरही फक्त आणि फक्त ऊर्जामंत्र्यांनी दुरध्वनीच्या माध्यमातून राणे कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन सात्वन करत मानसिक आधार दिला आहे.
परंतु आज बातमी लिहिली तो पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्यापासून पाचोरा व भडगाव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सत्ताधारी आमदार, माजी आमदार, विरोधीपक्ष नेते कार्यकर्ते यांच्यापैकी एकही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी राणे कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहचून माणूसकी दाखवली नसल्याने भडगाव, पाचोरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून राजकीय पदाधिकाऱ्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली जात असून राणे कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे..