मुंबईच्या बाबूचा वरखेडी परिसरात थरार, रेशनिंगच्या तांदळाचा दिवसाढवळ्या काळाबाजार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२४
वरखेडी येथून जवळच असलेल्या सावखेडा रस्त्यावर एक राईस मिल असून या मिलमध्ये मागील काही वर्षांपासून रेशनिंगच्या तांदूळाची मोठ्या प्रमाणात अवैध खरेदी केली जात असल्याचे जनमानसातून ऐकावयास येत आहे. याबाबत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला आहे. मात्र या राईस मिलचा मालक हा मुंबईचा असल्याने तसेच याच मिल मालकाला यावल व चोपडा येथून काही इसमांचे भागिदारीच्या बोलीवर पाठबळ मिळत असल्याने यांना मिळणाऱ्या राजकीय पाठिंब्यावर दिवसाढवळ्या, राजरोसपणे रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विकत घेतला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत वारंवार तक्रार करुनही संबंधित अधिकारी व कारवाई करत नाहीत यामागील कारण जाणून घेतले असता मुंबईच्या बाबूचा पैश्याच्या व राजकीय पाठिंब्यावर दरारा निर्माण झाला आहे म्हणून राईस मिलमध्ये यांचा थरार अनुभवायला येत असल्याने रेशनिंगच्या तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरु आहे असे समजते.
विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्वर, शेंदुर्णी, पहूर, नेरी, लोहारा, धुळे, भडगाव, पाचोरा, जामनेर, सोयगाव, सामनेर, नांद्रा गाव परिसरातून लहानमोठे व्यापारी गावागावात फिरुन लोकांना मिळालेला रेशनिंगचा तांदूळ १८/०० रुपये ते २२/०० रुपये प्रति किलो प्रमाणे विकत घेऊन तोच तांदूळ वरखेडी येथून जवळच असलेल्या सावखेडा रस्त्यावर असलेल्या राईस मिलमध्ये २८/०० ते ३०/०० रुपये किलोने विकून दरमहा शेकडो क्विंटल तांदूळ विकत आहेत. विशेष म्हणजे रेशनकार्डावर मिळालेले धान्य विकने किंवा ते धान्य विकत घेणे नियमबाह्य असल्यावरही दररोज तीन ते चार ट्रक तांदूळ खरेदी करण्याचा हा गोरखधंदा दिवसाढवळ्या, राजरोसपणे आजही सुरु आहे.
गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून हे धान्य वाटप करतांना रेशन दुकानदार सुध्दा रेशनकार्ड धारकांना पुरेसे धान्य वाटप करत नसून तेही हे धान्य वरील राईस मिलमध्ये विकून दरमहा हाजारो रुपये कमाई करत आहेत. असे असले तरी या गैरप्रकाराकडे जिल्हा व तालुका स्तरावरील जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे मुद्दामहून कानाडोळा करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा गैरप्रकार रोखण्यासाठी काही सुज्ञ नागरिक लवकरच वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.