लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक आंदोलनाच्या पावित्र्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२३
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालय हे अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असून या दत्त माध्यमिक विद्यालयाबाबत दररोज नवनवीन किस्से व तक्रारी समोर येत आहेत संस्थाचालकाच्या मनमानीमुळे या विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता पालकवर्ग आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
कारण की दत माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून पाचवीच्या वर्गात २९ सहावीच्या ४७ सातवीच्या ५८ आठवीच्या ३४ नववीच्या ३७ व दहावीच्या वर्गात ३७ अशी वर्गवारी विद्यार्थी संख्या असून एकुण २४२ पटसंख्या आहे. परंतु संस्थाचालकाच्या मनमानीमुळे या शाळेला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला ग्रहण लागले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण या दत्त माध्यमिक विद्यालयात दोन, दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकाच शाळाखोलीत बसवून शिकवले जाते यामुळे एकाच वर्गात विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने गुराढोरांसारखी परिस्थिती निर्माण झाली असून वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतांना शिक्षकांना व शिक्षक नेमके काय शिकत आहेत हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कारण या शाळेत मुलांमधीलींसाठी शौचालय, मुतारी, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून येते आहे. म्हणून या शाळेकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन संस्थेच्या अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे अलीकडे शिक्षणक्षेत्राचे खाजगीकरण झाल्यापासून या क्षेत्रात धनदांडग्यानी व व्यवसायिकांनी उडी घेतली असून त्यांनी पैश्याच्या जोरावर सरस्वतीच्या मंदिरात एकप्रकारे व्यवसाय सुरु केला असल्याने शिक्षक व प्राध्यापकांच्या नेमणुकाच गुणवत्तेनुसार न होता लक्ष्मीच्या जोरावर केल्या जात असल्याने गुणवत्ता असूनही शिक्षकांना नियुक्ती न देणे आणि ज्या उमेदवाराकडून सर्वाधिक देणगी (मलिदा) मिळेल त्याची निवड करणे किंवा त्याला सेवेमध्ये कायम करणे हा आता शिक्षण संस्थांचा अलिखित नियमच बनला आहे.
यामुळे बऱ्यापैकी असलेल्या संस्थेमध्ये माध्यमिक शाळेत शिक्षकपदी नियुक्त व्हायचे असेल तर १५ ते ३० लाख रुपये देणगी द्यावी लागते. उच्च माध्यमिक शिक्षक व्हायचे असेल तर आकडेवारी वेगळी आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व्हायचे असेल तर मग विचारुच नका लाखो रुपये देणगीचे आर्थिक सहकार्य (लाच) संस्थेला करावे लागते. बरे, एवढे करूही दोन वर्षे पगार मिळणार नाही, अशा भयानक अटी या वेळी घातल्या जातात.प्रश्न देणगी घेण्याचा किंवा देण्याचा नाही, तर शैक्षणिक गुणवत्तेचा आहे.
एखादा तरुण नोकरी मिळवण्यासाठी देणगीचे पैसे भरू शकत नसला तर त्यांच्या गुणवत्तेवर विचार न करता धनशक्तीच्या जोरावर नोकरी दिली जात असल्याने पात्र शिक्षकांना डालवले जात असल्याची बरीचशी उदाहरण पहावयास मिळतात आसाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयातील जयेश चौधरी या शिक्षकाने केला असून तीस लाख रुपयांची देणगी देऊन मी नोकरी मिळवली आहे माझ्या नियुक्तीला शासकीय मान्यताप्राप्त झाली असल्यावरही मला अद्याप पर्यंत पगार मिळात नाही तसेच संस्थाचालक मला नहाकच मानसिक ताण देतात तसेच संस्थाचालकाच्या बाबतीत गंभीर आरोप या विरोधात प्रसारमाध्यमांकडे केले आहेत.
परंतु हे आरोप किती खरे किती खोटे ही बाब मात्र संस्थाचालकांना भेटल्याशिवाय कळणार नसल्याने सत्यजित न्यूज लवकरच याबाबत संस्थाचालकांना भेटून सत्य परिस्थिती जाणून घेणार आहे.
*अधिक माहिती पुढीलप्रमाणे*
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे सन १९९२ साली नवल भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्त माध्यमिक विद्यालय ही शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आली होती. या माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग नियमित व चांगल्याप्रकारे सुरु होते. परंतु काही कारणास्तव ही संस्था नवल भाऊ प्रतिष्ठानतर्फे विकण्यात आली असून हे दत्त माध्यमिक विद्यालय बिस्मिल्लाह मल्टिपर्पज फॉउंडेशन चे अध्यक्ष सय्यद बागवान यांनी घेतली आहे. परंतु या शैक्षणिक संस्थेची विक्री करतांना मात्र शाळेची इमारत व स्थावर मालमत्ता नवल भाऊ प्रतिष्ठान यांनी विक्री केली नसल्याने दत्त माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासाठी सय्यद बागवान यांना इमारत पाहिजे होती. संस्था विक्री झाल्याची बाब लोहारी ग्रामस्थांना माहीत झाल्यावर लोहारी गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या परंतु संस्था ही खाजगी असल्याकारणाने लोहारी ग्रामस्थांजवळ काही पर्याय नव्हता परंतु आता ऐनवेळी जर दत्त माध्यमिक विद्यालयातील मुलांना शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही तर लोहारी येथील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल ही बाब लक्षात घेऊन लोहारी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या रिकाम्या असलेल्या शाळा खोल्या दत्त माध्यमिक विद्यालयाला भाडेतत्त्वावर देण्यासाठी २५ जानेवारी २०२० ला एक ठराव करुन जिल्हापरिषदेकडून मान्यता मिळवून घेत दत्त माध्यमिक विद्यालयाला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.
परंतु या दत्त माध्यमिक विद्यालयाचे संस्थाचालक सय्यद बागवान हे मनमानी कारभार करत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आल्यामुळे लोहारी येथील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण पाटील यांनी या संस्थेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून चौकशीची मागणी केली आहे.