पिंपळगाव हरेश्वर, वरसाडे तांडा व कौली परिसरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस, घरांची पत्रे उडाली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२३
सद्यस्थितीत मराठवाड्यातील सोयगाव, सिल्लोड, हळदा, डखला, जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पारोळा, जामनेर तालुक्यात फत्तेपूर, पहुर, शेंदुर्णी तसेच इतर भागात मागील आठवड्यापासून सतत ढगाळ वातावरणासह वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळीवाऱ्यामुळे बऱ्याचशा घरांच्या छताची तसेच शेतकऱ्यांनी गाव परिसरात तसेच शेतात बांधलेल्या घोड्यांची पत्रे उडाल्याने काही शेतकऱ्यांचा कापूस, पाळीव जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा, शेतात उभे असलेले मका, बाजरी, दादर, सुर्यफुल, टरबूज, भाजीपाला तसेच गावरान आंब्याच्या झाडावर असलेल्या कैऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी दुपारी अंदाजे अडीच ते चार वाजेच्या वेळात पाचोरा, अंबे वडगाव, पिंपळगाव हरेश्वर, वरसाडे तांडा तसेच सोयगाव तालुक्यातील कौली परिसरात जोरदार वादळ येऊन पावसाला सुरुवात झाली या वादळी वाऱ्यामुळे बऱ्याचशा घरांची पत्रे उडून गेली तसेच काही जुनी रुक्ष मोडून पडले असून गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतात असलेले उभे पिक, कापून ठेवलेला मका व मक्याचा चारा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदार म्हणून शासनाने या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे.
याच वादळात कौली येथील बनाबाई शेनफडू थोरात. वय वर्षे (७०) या भूमिहीन शेतमजूर महिलेच्या घराची पत्रे उडाली पत्रे उडाली तेव्हा या आजीबाईं घरातच बसलेल्या होत्या नेमके पत्रे उडाली तेव्हा पत्र्यावर ठेवलेला दगड आजीबाईंच्या अंगावर पडून त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर जोराचा मार लागल्याने आजीबाईं काही वेळ बेशुद्ध पडल्या होत्या विशेष म्हणजे या आजीबाईंना मुलगा नसून एक मुलगी आहे मात्र ती सासरी नांदत असल्याने या निराधार आजीबाईंना उपचारासाठी पैसे नसल्याने शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी कौली येथील ग्रामस्थांनी सत्यजितच्या माध्यमातून केली आहे.