सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा, जामनेर वनविभागात कुंपणच शेत खातय, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार साहेब लक्ष देतील का ?

पाचोरा, जामनेर वनविभागात कुंपणच शेत खातय, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार साहेब लक्ष देतील का ?

By Satyajeet News
June 2, 2022
1304
0
Share:
Post Views: 186
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०६/२०२२

(वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा भ्रमणध्वनी अहवाल काढल्यावर त्यांचे लाकुड व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबंध उघड होतील यात तिळमात्र शंका नाही. परंतु गरज आहे ती इच्छाशक्तीची.)

पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. या वृक्षतोडीत दररोज शेकडो हिरव्यागार महाकाय वृक्षांची स्वयंचलीत मशनरीच्या साह्याने काही मिनिटांतच दिवसाढवळ्या कत्तल केली जात असून यात वड, निंब, आंबा व इतर झाडे कापली जात आहेत. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणुन, बुजुन दुर्लक्ष करत असल्याचे निसर्गप्रेमी ठामपणे सांगतात कारण जामनेर व पाचोरा तालुक्यातील गावागावांतील शेत शिवारात तसेच राखीव जंगलात मागील तीन महिन्यांपासून स्वयंचलित मशनरीच्या साह्याने दिवसाढवळ्या झाडांची कत्तल सुरु आहे. ही होणारी कत्तल पाहून निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमींनी पाचोरा वनविभागाचे मुलाने साहेब व इतर कर्मच्याऱ्यांना वारंवार फोन करुन वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे व दररोज अनेक सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमी मागणी करत आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना या वीरप्पनच्या पिल्लावळीकडून कडून मोठ्या प्रमाणात हप्त्याच्या रुपाने हजारो रुपये मिळत असल्याने संबंधित अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत असा आरोप जनतेतून केला जात आहे.

पाचोरा वनविभागाचे हद्दीत शिंदाड, पिंपळगाव हरेश्र्वर, वरसाडे तांडा व इतर गाव परिसरातील शेत शिवारात व नद्या, नाल्यांच्या थडीवरील म्हणजे (तहसील हद्दीतील) हिरव्यागार वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. (विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्र्वर येथील रहिवासी व जामनेर वनविभागात महत्वाच्या पदावर कामावर असलेल्या एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची शेत जमीन पिंपळगाव हरेश्र्वर येथुन जवळच असलेल्या कोल्हे शिवारात व बाफणा कृषी विद्यालयाच्या जवळच असून या शेतजमिनीवरील तसेच नाल्यांच्या बांधावरील जवळपास ३० हिरव्यागार वृक्षांची कोणतीही रितसर परवानगी न घेता दिवसाढवळ्या कत्तल होत आहे.

म्हणून पाचोरा व जामनेर वनविभागातील अधिकाऱ्यांना आपण शासनाचा पगार घेत आहोत याची थोडीतरी जान असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे आम्ही पाचोरा तालुक्यातील गावागावांतील शेत शिवारात झालेली भरमसाठ वृक्षतोड दाखवतो आज ज्या, ज्या भागात वृक्षतोड झालेली आहे त्यापैकी बऱ्याचशा प्रमाणात लाकुड गायब झाले आहे मात्र पुरावा म्हणून आजही या महाकाय वृक्षांची खोड (बुंधा) जसेच्या तसे आहेत. ते पाहून रितसर पंचनामा करुन कारवाई केली तर अश्या अधिकाऱ्यांचा सत्यजित न्यूज नक्कीच तालुकास्तरावर कार्यक्रम आयोजित करुन जाहीर सत्कार करेल असे खुले आव्हान आम्ही सत्यजितच्या माध्यमातून जाहीर करत आहोत.

वृक्षतोड थांबवणे काळजी गरज~

एका बाजूला दररोज हजारो एकर शेतजमीनीचे बिगरशेतीत रुपांतर होत असून या सुपिक जमिनीवरील हिरवीगार वनराई, झाडं, झुडप नष्ट होऊन त्याजागी सिमेंटची जंगल उभारली जात आहेत. तसेच दररोज नवनवीन कारखाने उभारले जात असून यातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे. तसेच दररोज हजारो नव्हे तर लाखो स्वयंचलित वाहनांची भर पडत असून ही वाहने दररोज कार्बनडाय ऑक्साइड ओकत आहेत. हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण झपाट्याने कमी होत असून ओझोन वायूचा स्तर घटत आहे. या दुष्परिणामुळे व प्रदूषणामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिघही ऋतूमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अशा बऱ्याचशा घातक बाबींचा विचार केला तर निसर्ग संपदा वाचवणं महत्वाचे आहे.

परंतु दिल्ली ते गल्लीतील लोकप्रतिनिधी वातानुकुलीत बंगल्यात व वातानुकुलीत गाडीत फिरत असल्यामुळे त्यांना या वृक्षतोडीचे काही एक देणेघेणे नसल्याने ते या होणाऱ्या वृक्षतोडीकडे व ही वृक्षतोड थांबवी म्हणून कोणतेही प्रयत्न करत नसून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची कानउघडणी करत नसल्याने हे अधिकारी व कर्मचारी मस्तावले आहेत. म्हणून वनविभागाचे अधिकारी सर्वसामान्य जनतेतून वृक्षतोडीबद्दल वारंवार आवाज उठवून सुध्दा लक्ष देत नसल्याचे जाणवते आहे.

संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला सांगत. ’सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. कितीही करोडपती माणूस असला त्याची लोखो रुपयांची किंमती चारचाकी उन्हाळ्यात झाडाखालीच लावतो हे पाहिल्यावर त्यांच्या श्रीमंतीची चिड येते.

अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘After man the desert’ ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे.

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते . तुळस, वड, पिंपळ यांची पूजा ते करत असत. त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोतरा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते. वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत.

आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६० % भाग वनांनी व्यापलेला होता, सध्या पृथ्वीचा केवळ २१ % भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरूस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधात आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. गतवर्षी केदारनाथला झालेली भयावह परिस्थिती जंगलतोडीचे परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे म्हणून सत्यजित न्यूज वारंवार आवाज उठवत आहे. या मागील आमचा एकच उद्देश आहे व तो म्हणजे जंगलतोड रोखणे, जंगलतोडीमुळे मानवी व पर्यावरणावर होणारा परिणाम या समस्यांपासून सुटका कशी करावी ? हे सांगण्याचा प्रयत्न करुन जेणेकरून जनमानसातून जनजागृती होऊन जंगलतोड रोखली जाईल.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

विद्युत वितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेत घोळ ? ...

Next Article

सावखेडा येथील ४२ वर्षीय तरुण मजुराचा नदीपात्रात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव परिसरात उद्योगपतीची मनमानी, सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया.

    December 31, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

    February 20, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची निवड.

    May 25, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द भाजप शाखेतर्फे घरोघरी मोफत तिरंगाचे वाटप.

    August 12, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.

    March 19, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा न्यायालयात उद्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन.

    November 11, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    भडगाव, तिर्थक्षेत्र कनाशी रस्त्यासाठी सव्वा तिन कोटी रूपये मंजुर, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन संपन्न.

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    मृत्यूच्या तांडवातही पत्रकार बेहाल.(पत्रकार महेंद्र खोंडे.)

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पत्रकार संवाद यात्रा पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज