शेतकऱ्यांचा विरोध असलेले ते तिन्ही कृषी कायदे मागे मा.पंतप्रधानांची घोषणा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/२११/२०२१
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज सकाळी देशवासियांनी संबोधित करतांना संसदेने पारित केलेली तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. शेतकर्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकर्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार शेतकर्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने शेतकर्यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता. मात्र शेतकर्यांच्या हिताची बाब, आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकर्यांना समजावून सांगू शकलो नाही. यामुळे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून दिली.
तिन्ही कृषी कायद्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असून याच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर, मोदींची घोषणा महत्वाची मानली जात असून याचा राजकीय क्षेत्रावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.