पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळ सक्रिय, मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०३/२०२४
********************************
ब्रेकिंग ~ विशेष म्हणजे चिंचपुरा येथील नवतरुण कायदेतज्ञ मा. श्री. निलेश उभाळे यांनी अवैध वृक्षतोड व अवैध सॉ मिल बाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना भोजे येथे येऊन संबंधित सॉ मिलची सखोल चौकशी करावी लागते यावरुनच पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणाचा बुरखा फाटला असल्याने येत्या आठ दिवसात पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील होणारी वृक्षतोड थांबवून लाकुड वखारीवर तसेच इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध लाकुड साठ्याची चौकशी करुन रितसर पंचनामे न झाल्यास निसर्गप्रेमी वनविभागाचे अधिकारी व जेथेही दिसतील तेथे त्यांच्या तोंडाला काळे फारणार आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे.
**********************************
एका बाजूला शासन वृक्षसंवर्धन साठी लाखो रुपये खर्च करत असतांनाच दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून या तीनही तालुक्यात खाजगी मालकीची तसेच सार्वजनिक व राखीव जंगलाच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, वनविभाग तथा महसूल विभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सर्वदूर दिवसाढवळ्या राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु आहे. हि वृक्षतोड करतांना स्वयंचलित मशीनचा वापर केला जात असल्याने काही वेळातच महाकाय वृक्ष जमीनदोस्त होतांना दिसून येतात. मोठमोठे वृक्ष जमीनदोस्त करुन लगेच ट्रॅक्टर मधुन बिनधास्तपणे रस्त्यावरुन वाहतूक करत वरखेडी येथील एका जिनिंग मधील वजन काट्यावर वजन करुन भोजे, पाचोरा व लोहारा येथील लाकुड वखारीवर पाठवले जाते असाच प्रकार भडगाव व जामनेर तालुक्यात बिनधास्तपणे सुर आहे.
या सर्व गैरप्रकाराकडे पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हि होणारी वृक्षतोड थांबावी म्हणून आजपर्यंत बऱ्याचशा निसर्गप्रेमींनी वनविभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पैशाचा माज उतरला असल्याने निसर्गप्रेमींनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता उलट तक्रारदारांनाच विविध प्रश्न विचारुन एकप्रकारे दडपण आणण्यासाठी प्रयत्न केला जातो अशी माहिती निसर्गप्रेमींनी सत्यजित न्यूज कडे कथन केली आहे.
*********************************
सद्यस्थितीत दररोज हजारो एकर जमिनीचे बिगरशेतीत रुपांतर होत असल्याने या शेतजमिनीवरील शेकडो वृक्षांची कत्तल होऊन त्याठिकाणी सिमेंटची जंगले उभी रहात आहेत. तसेच नवनवीन प्रकल्प, रस्ते रुंदीकरण, गायराण व वनजमिनींवर झालेले अतिक्रमण व दररोज वाढते आहे. यामुळे दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास भविष्यात प्रत्येकाच्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जगण्याची वेळ येईल अशी भिती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. म्हणून वेळीच जागे होऊन सर्वांनी ही वृक्षतोड थांबवली पाहिजे अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.