५० दिवस पूर्ण झाले तरीही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्याने धनगर समाज आक्रमक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२३
धनराज समाजबांधवांनी धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करुन देखील अद्याप पावेतो धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. तसेच शासनाने दिलेल्या मुदतीचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासकीय पातळींवर साधं पानही हललं नाही, ही अत्यंतिक खेदाची बाब आहे. राज्य प्रमुख म्हणून आपण मुख्यमंत्री पदी आहात. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘राजधर्म’ पाळावा लागतो, मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात. ते सर्वांचे असतात, सर्वसमावेशक असतात. एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता, धनगर आरक्षणाकडे उदासीनता दाखवता, ही बाब. अत्यंत खेदजनक आहे. कारण ज्या पद्धतीने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठीतात्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे. तसेच आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणाऱ्या तीव्र लढ्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा देण्यात आला आहे.
कारण महाराष्ट्र राज्यात जवळपास तीन कोटी धनगर समजबांधव अस्तित्वात असून डोंगरदऱ्यात फिरुन भटकंती करत मेंढपाळ व्यवसाय करुन आपली उपजीविका भागवतात यामुळे मुलाबाळांचे शिक्षण व आर्थिक प्रगती थांबली आहे. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला मागील सत्तर वर्षांपासून एस. टी. प्रर्वगात स्थान दिल असले तरीही आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून धनगर समाजाने आजपर्यंत ठिकठिकाणी आंदोलन व आमरण उपोषण केले तेव्हा या आंदोलनात गाव, खेड्यापाड्यातील धनगर समाजबांधवांनी उडी घेतली होती. तेव्हा
अश्या आशयाचे निवेदन पाचोरा तालुक्यातील धनराज समाजबांधवांनी मा. ना. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मा. प्रांताधिकारी साहेब पाचोरा, मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांना दिले असून या निवेदनावर विशाल पाटील, समाधान पाटील, शुभम आहीरे, उत्तम पाटील, पवन पाटील, विशाल हाटकर, विलास पाटील, शिवाजी पाटील, ईश्वर देशमुख यांच्या सह्या आहेत.
निवेदनातील मुद्दे.
आज तुमच्या हाती धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले. जिल्तयांपासून ते गाव खेड्यांपर्यंत आंदोलनाचे लोण परसले होते. या अनुशंगाने एक बैठक घेतली, या बैठकीत तातडीने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचे पुरावे देत धनगर समाजाच्या उध्दारासाठी आठ योजनांची मागणी केली होती. यात एस. टी. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्त्व न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९११/२०११७) अँड कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करण्यात यावी, मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात येऊन स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करण्यात यावी, जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात तसेच मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे, बिरोबा मंदिर देवस्थानाच्या (१) श्री बिरोबा देवस्थान, आरेवाडी ता. कवठेमहांकाळ, २)श्री महालिंगराया देवस्थान, हुलजंती ता. मंगळवेढा, ३) श्री बिरोबा देवस्थान, हुन्नूर ता. मंगळवेढा, ४)श्री देवस्थान, पट्टणकोडोली ता. हातकणंगले, ५) श्री वाशी अवघडखान देवस्थान, वाशी विठ्ठल बिरदेव कार्यालय, पाचोरा ता. करवीर) या मुळ स्थानांच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविंधासाठी आणि सुशोभिकरणासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी. इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.