पाचोरा शहरातील रहिवाश्यांच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या, सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२३
पाचोरा शहराचा कारभार पाहण्यासाठी नगरपालिका स्थापन झाल्यापासून तर आजपर्यंत संपूर्ण पाचोरा शहरात साफसफाई करुन स्वच्छता राखत दुर्गंधी, केरकचऱ्या पासून लांब ठेवून पाचोरा वासियांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करुन देत अनेक आजारांपासून लांब ठेवणाऱ्या सफाई कामगारांच्या घर परिसरातच अनेक सुविधांचा अभाव असल्याकारणाने सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरात शांती नगर, शिवाजी नगर, वाल्मिकी नगर परिसरात २८ खोल्यांची सफाई कामगार कॉलनी आहे. परंतु या सफाई कामगारांच्या कॉलनीत असलेले रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, सार्वजनिक शौचालये वर्षानुवर्षांपासून तशीच जुनी असून या भागात रस्ते, गटारी व घरांचे नुतनीकरण होऊन घरातील विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा म्हणून नवीन फिटींग करुन ज्या, ज्या घर इमल्यात वर्षानुवर्षे रहात असलेल्या सफाई कामगारांच्या नावे अद्यापपर्यंही झालेली नाहीत ती घरे राहिल त्याचे घर याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीच्या नावावर त्वरित करुन मिळावीत.
तसेच पाचोरा ते वरखेडी रस्त्यावरील वाघ डेअरी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स सेंटर जवळ असलेल्या क्लासिक टेलर यांच्या दुकानासमोर विर रतनसिंग वाल्मिकी ऋषींचा स्थंभ उभारण्यात येऊन या चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल मिळण्यासाठी दिनांक ०४ ऑक्टोंबर २०१९ रोजी झालेल्या ठरावाबाबत नगरपालिका स्तरावरील नियुक्त समितीने अद्यापावेतो कोणतीही माहिती दिलेली नसल्याने येत्या आठवड्यात लेखी स्वरूपात उत्तर देऊन माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
परंतु वारंवार अर्जफाटे व निवेदन देऊनही पाचोरा नगरपालिकेचे अधिकारी सतत दुर्लक्ष करत असल्याने वीर रतनसिंग चावरीया शक्ती सेना (भारत) मेहतर संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अतिश चांगले हे त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन दिनांक ०५ जून २०२३ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार होते. परंतु पाचोरा नगरपरिषदेकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन नियमात बसतील त्या तुमच्या मागण्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय तात्पुरता मागे घेतला असल्याची माहिती मा. अतीश चांगरे यांनी दिली आहे.