राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा प्रताप २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना चप्पल घालून केले अभिवादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२२
मा. श्री. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून त्यांचे वेगवेगळे उपदव्याप समोर येत आहेत. मागेही त्यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वदूर निषेध नोंदवून त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची जोरदार मागणी केली गेली आहे. परंतु हे राज्यपाल भाजपा धार्जिण असल्याकारणाने त्यांचे पद अबाधित राहिले व सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही म्हण खरी ठरली अश्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आज राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी नविन प्रताप केला असून पायात चप्पल घालून २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन केले त्यांच्या या कृतीमुळे सगळीकडे जोरदार टीका व संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आज मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या हल्ल्यातील शहिदांना भारतभर सगळीकडे, ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जात आहे. म्हणून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करत मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
याच वेळी मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पायातील चप्पल तशीच ठेवून पायात असलेल्या चपलेसह हुतात्म्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केली आहे. या घटनेची चित्रफीती कॉंग्रेसचे प्रवक्ते मा. श्री. सचिन सावंत यांनी तयार करुन भगतसिंग कोश्यारी हे पायात चप्पल घालून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करत असल्याबाबत संताप व्यक्त करत ती चित्रफीत ट्विट केली असल्याने ही बाब उघडकीस आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे भगतसिंग कोश्यारी अजून वादात अडकणार आहेत.