प्रारुप विकास आराखडा व जाचक करवाढ रद्द करण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा धडक मोर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/११/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे शहर मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये असल्याकारणाने शिक्षणाची पंढरी म्हणून या गावाची ओळख आहे. परंतु या गावचा कारभार सांभाळण्यासाठी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक व नगरसेविका यांच्यात ताळमेळ नसल्याने तसेच सद्यस्थितीत सत्तेवर असलेल्या महिला काही महिला नगरसेविका ह्या फक्त आणि फक्त नावालाच निवडून आल्यापासून याचे कामकाज त्यांचे पती पहात असल्याचे जनमानसातून चर्चेतून ऐकायला मिळत असून महिला राज नावालाच असल्याचा अनुभव येत आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतीवर मोर्यात निवेदन देऊन मुख्याधिकारी मा. साजिद पिंजारी यांच्याकडे तक्रार मांडतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री. संजयदादा गरुड.
यामुळे शेंदुर्णी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व विविध योजना राबवण्यासाठी तसेच कर आकारणी करण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांच्यात ताळमेळ जुळत नसल्याने यांच्यातील रस्सीखेच पाहून शेंदुर्णी नगरपंचायतीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी मा. जावेद पिंजारी यांची परिस्थिती अडकित्त्यात सापडल्या सारखी झाल्याचे दिसून येते. कारण शेंदुर्णी नगरपंचायतीने प्रस्तावित केलेली करवाढ व प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी काल दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी शेंदुर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर पंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता.
मा. श्री. सागरमल जैन.
हा मोर्चा काढण्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. श्री. संजयदादा गरुड यांच्या उपस्थितीत गरुड पतसंस्थेच्या सभागृहात नागरिकांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेत शेंदुर्णी नगर पंचायतीने केलेली प्रस्तावित करवाढ अन्यायकारक असून शहर विकासाचा प्रारुड आराखडा जनतेच्या अडीअडचणी व इतर उद्भवणाऱ्या समस्या लक्षात न घेताच बनवण्यात आल्यामुळे तो रद्दबातल करण्यासाठी गरुड पतसंस्थेच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा राष्ट्रवादीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. श्री. संजयदादा गरुड, मा. श्री. सागरमल जैन, मा. श्री. सुधाकर बारी, डॉ. मा. श्री. किरण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता.
जेष्ठ नागरिक मा. श्री. विलास भाऊ आहिरे.
नगर पंचायत कार्यालयात मोर्चा पोहोचल्यावर मुख्याधिकारी मा. साजिद पिंजारी हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. श्री. संजय गरुड यांनी नगरपंचायतीच्या वाढीव कराला नागरिकांचा विरोध आहे, तसेच प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीवर त्यांच्या संमतीविना ग्रीन, यलो, रेड अशा प्रकारे आरक्षणे परस्पर टाकण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे सांगितले, तशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना देऊन सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली प्रास्तावित करवाढ व तसेच प्रारुप विकास आराखडा आम्हा शेंदुर्णी नगरीतील ग्रामस्थांना मान्य नसून हे ठराव रद्द करण्यात यावेत अन्यथा आम्ही येत्या ०८ नोव्हेंबर २०२२ मंगळवार पासून शेंदुर्णी शहरातील सर्व व्यवहार, व्यवसाय बंद ठेवून आमच्या अटि मान्य होईपर्यंत बेमुदत कडकडीत बंद पुकारणार असून यात होणाऱ्या नुकसानीला व होणाऱ्या दुष्परिणामांना नगरपंचायत जबाबदार राहील असे सांगितले आले.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत त्याबाबत खुलासा देवतांना मुख्याधिकारी मा. साजिद पिंजारी.
यावेळी मोर्चामध्ये सुधाकर बारी, डॉ. किरण सूर्यवंशी, राजेंद्र पवार, भगवान अहिरराव, विलास अहिरे, प्रवीण, गरुड, अॅड. प्रसन्न फासे, डॉ. अल्केश नवाल, अनिल झंवर, गजानन बारी, नंदकिशोर बारी, विजय चौधरी, भरत बारी, योगेंद्र बारी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीराम काटे, गजानन धनगर, प्रदीप धनगर, योगेश गुजर, फारूक खाटीक, किशोर भावसार, निसार पहिलवान, अजय निकम, धनंजय गरुड, शेखर पवार, अशोक वानखेडे, तन्वीर पटोकर, शकुर शेख, नीलेश महाले, विश्वनाथ ओव्हाळ, विलास पाटील, दिलीप नाथ व बहुसंख्य नागरिक मोठ्या उपस्थित होते.
या मोर्चाचे वेळी पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.