सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›शेतकऱ्याच्या पोरांनो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या, मोर्चात सहभागी होऊ नका. “संतोष पाटील”

शेतकऱ्याच्या पोरांनो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या, मोर्चात सहभागी होऊ नका. “संतोष पाटील”

By Satyajeet News
January 26, 2022
178
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिनांक~२६/०१/२०२२

आपल्यावर झालेला अन्याय किंवा आपल्या हक्क मागण्यांसाठी संविधानिक मार्गानं लोकं एकत्र करून मोर्चा काढला जातो, आपल्यावरील अन्याय दूर करून न्याय मिळवून घेता येतो, शासनातील व प्रशासनातील लोकांना खडबडून जागे करण्यासाठी मोर्चाचे हत्यार योग्यच आहे मग तो कुठल्याही कारणासाठी असो ते हत्यार उपसायला हवं ,लोकांनी एकत्र येत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी आपली न्याय्य बाजू लावून धरून न्याय मिळवून घेतला पाहिजे. दीनदुबळ्या वंचित शेतकऱ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न किंवा इतर नागरी सुविधांसाठी खेड्यापाड्यातील गरीब दुबळ्या जनतेसाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे ,मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्या कारणांसाठी कोणीच मोर्चा काढत नाही ,तर मोर्चा का काढला जातोय हे आधी समजून घेतलं पाहिजे *आपल्या पक्षात आपल्या मतदार संघात व* *आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आपलं वर्चस्व कायम टिकून राहिले पाहिजे* म्हणून हे मोर्चे काढले जातात खरं म्हणजे या मोर्चेकऱ्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न माहीत नाहीत, काही मुठभर लाभार्थी कार्यकर्ते सोबत घेऊन हे लोक धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात, मला मान्य आहे मोर्चा काढण्याचा, आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा, व न्याय मागण्याचा संविधानिक अधिकार सर्वांनाच आहे. पण आपण कशासाठी हे सारे करतोय हे कळलं पाहिजे, नुसत्या शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता मिळवणारे रक्तपिपासू नेते राजकारणी लोक समाजामध्ये दुही माजवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रोजी संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे माघाईचा राक्षस सर्वत्र चाल करून येत आहे, नित्य जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तीन पट दराने खरेदी करावे लागत आहेत सामान्य माणूस कसातरी आपलं जीवन जगत असताना त्याच्यासाठी कुठल्याच कल्याणकारी योजना आता कार्यान्वित दिसत नाहीत, असतील ही तर त्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटल्या जातात व सामान्य माणूस तसाच आ वासून उभा असतो, सामान्य माणसापर्यंत कल्याणकारी योजना कधीच पोहोचत नाहीत आणि त्याच्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही आवाज उठवला जातो तो सत्तेसाठी, *जेव्हा आपले सरकार असतं* *तेव्हा सामान्य माणसांचे गरिबाचे शेतकऱ्यांचे प्रश्न साधे* *ऐकून घेतले जात नाहीत* जेव्हा सरकार पडतं आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागतं तेव्हा त्यांना सामान्य माणूस गरीब दुबळा शेतकरी आठवतो ,आणि मग विद्यमान सरकारला कोंडीत धरण्यासाठी या गरिबांचं भांडवल करून ते लोक मोर्चाचे नियोजन करतात ,यामध्ये सहभागी होणारे 70 टक्के कपाळकरंटे शेतकऱ्याचे पोरं असतात त्यांना फक्त आपल्या नेत्यासाठी आपला जीवन कुर्बान करायचं असतं, बाप मातीत खापतोय कधी झाडावर लटकतोय याचं त्यांना सोयरसुतक नसतं ,अशा या अवलादी बापाच्या मरणाचं खरं कारण ठरत आहे, नेता फक्त खुर्ची टिकण्यासाठी सत्तेसाठी खोटं खोटं शेतकऱ्या बद्दल चे प्रेम दाखवत असतो खरं पाहिलं तर त्याला शेतकऱ्यांशी व त्यांच्या पोरांशी काहीच घेणंदेणं नसतं, पण ही शेतकऱ्यांची बावळट पोरं आपले कामधंदे सोडून बापाच्या मारेकऱ्यांच्या झेंडे खांद्यावर घेऊन मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहे, जर तुमची सदसद्विवेकबुद्धी जागृत असेल तर थोडा विचार करा अभ्यास करा आपले कुठे चुकत आहे मित्रहो माझी तळमळ समजून घ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोर्चात सहभागी होऊ नका, हे आपल्या बापाचे मारेकरी आहेत इतकं लक्षात ठेवा अन्यथा आपला विनाश ठरलेला आहे.

संतोष पाटील
7666447112

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 57
Previous Article

अंबे वडगाव शिवारात अत्यावस्थ अवस्थेत आढळलेला मोर ...

Next Article

ह्युमन डेव्हलपमेंट फांऊंडेशन तसेच भारव्दाज नेटवर्क सोल्युशन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का, दिलीप जैन सह शेकडो कार्यकर्ते शिंदे गट शिवसेनेत दाखल.

    September 6, 2025
    By Satyajeet News
  • राजकीय

    ज्ञानेश्वर सोनार व असंख्य कार्यकर्त्यांचा आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश.

    November 29, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे,अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा~शिवसेना.

    June 15, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    राहुल को लाना है देश को बचाना है या घोषणांनी पाचोरा शहर दणाणले.

    June 22, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    कोविड काळात पाचोऱ्याची जनता घरांत,मात्र नगरपरिषदेने काढली भूखंड घोटाळ्याची २०० कोटींची वरात.

    August 24, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    निलंबना नंतर आमदार गिरीश महाजनांची घणाघाती टीका.

    July 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून अंबे वडगाव व कोल्हे येथील अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई.

  • क्राईम जगत

    वावडदे गावात अवैध धंदे आबादी, आबाद, अल्पवयीन व तरुण पिढी होतेय बर्बाद.

  • पाचोरा तालुका.

    ठेकेदार होऊन मलिदा खाण्यासाठी उमेदवारी करु नका, गावाचा विकास साधला पाहिजे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज