आज विसुसावि परिवारातर्फे “अमृत महोत्सव आईचा” या सोहळ्याचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२४
सद्यस्थितीत धावपळीच्या जीवनात माणूस जवळ असुनही बरेच दिवस एकमेकांशी भेटु वा बोलु शकत नाही. यामुळे नवीन पिढीला आपले आईवडील, आजी, आजोबा यांची ओळख व्हावी तसेच महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांनी जोपासलेली संस्कृती, विचार, आदर्श, संस्कार व कर्तृत्ववाचा वारसा जोपासण्यासाठी तसेच वारसा नवीन पिढीने अंगीकृत करण्यासाठी, या कार्यक्रमानिमित्त तीन पिढ्या एकत्रित येऊन गाठीभेटी होऊन ओळख निर्माण करुन तीन पिढ्यांची ओळख होऊन नात्यातील अंतर कमी होण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीचे विचार पुढे येण्यासाठी आज दिनांक १० फेब्रुवारी २०२४ शनिवार रोजी वरखेडी येथील गं. भा. पदमाफाई सुदामशेठ सोनार यांच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्ताने ७५ वर्षाचा जीवन प्रवास पूर्ण केल्याबद्दल ७५ माऊलींचा विसुसावि परिवारातर्फे “अमृत महोत्सव आईचा” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
“अमृत महोत्सव आईचा” हा सोहळा पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर असलेल्या साई मोक्ष लॉन्स येथे आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजेपासून तर १२ वाजेपर्यंत प्रतिमा पउजन, दीप प्रज्वलन करुन सस्नेह भोजनाने होणार आहे. नंतर दुपारी १२ ते ०३ वाजेपर्यंत मान्यवरांचा सत्कार व सन्मान सोहळा, दुपारी तीन वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेष्ठ मंडळींकडून मार्गदर्शन व अनुभव यावर चर्चा सत्र व सायंकाळी पाच वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत संगीत, समारोप व आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा उद्देश व कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसेच जेष्ठ मंडळीचे मार्गदर्शन व अनुभवाची शिदोरी मिळवण्यासाठी सर्व परिवारासह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन विसुसावि परिवारातर्फे करण्यात आले आहे.