गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२४
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह चॅलेंज या स्पर्धेअंतरगत अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील तृतीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थ्यांनी कुमारी गायत्री सुकलाल पाटील हिला जिल्हास्तरावरील नाविन्यपूर्ण पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सदर स्पर्धेत उद्योग सुरू करण्यासाठी विजेत्यांना रुपये एक लाखाचे बीज भांडवल दिले जाणार आहे. या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
वयस्कर लोकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका व्हावी व त्यांना योग्य त्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी या विद्यार्थिनींनी काठी बनवलेली आहे या नावीन्यपूर्ण काठी साठीच पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सदर उपक्रमात तिला कुमारी रंजना सुनील कुमावत या विद्यार्थिनीचे सहकार्य प्राप्त झाले. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांनी काम पाहिले. सदर यशासाठी २६ जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्याकडून विजेत्यांचा सत्कार पोलीस कवायत मैदान जळगाव येथे माननीय जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद तसेच पालकमंत्री माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य प्रमाणात करण्यात आला.
तसेच महाविद्यालयातर्फे कु. गायत्री आणि मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला . संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड,सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव श्री उत्तम दादा पाटील तसेच श्री दीपक भाऊसाहेब गरुड ,प्राचार्य प्रा श्याम साळुंखे, सर्व उपप्रचार्य , प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.