सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी होतकरु तरुणांसाठी उघडले ज्ञानाचे भांडार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२३
सद्यस्थितीत खेड्यापाड्यातील मुले आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मोलमजुरी करुन शिक्षण घेत आहेत. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असतांना वाढत्या महागाईच्या काळात चांगली पुस्तके व पोलीस किंवा सैन्यदलात भरती होण्यासाठी शारीरिक व्यायाम करण्यासाठी लागणारे व्यायामाचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने बऱ्याचसे होतकरु तरुण रस्त्याच्या कडेला व्यायाम व कुठेतरी झाडाखाली अभ्यास करतांना दिसून येते होते ही तरुणांची घुसमटत होत होती.
ही बाब पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेबांनी आपले दैनंदिन कामकाज करतांना येणाऱ्या जनसंपर्कातून ओळखली व आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनाशी बाळगून आपण या तरुणांसाठी काहीतरी केले पाहिजे अशा भावनेतून गावागावातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची व इतर चांगल्याप्रकारची पुस्तके वाचायला मिळावी व व्यायामासाठी गोळाफेकचा सराव करण्यासाठी गोळा व चांगले साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी शिंदाड, सातगाव, पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा, लोहारा, अंबे वडगाव गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वखर्चाने वाचनालयासाठी लागणारे फर्णीचर, पुस्तके व व्यायाम शाळा सुरु करुन व्यायामाचे साहित्य देऊन होतकरु तरुणांसाठी नवसंजीवनी दिली आहे.
मा. श्री. वाघमारे साहेब येथेच थांबले नाहीत तर त्यांनी गरीब होतकरु तरुणांचा शोध घेत त्यांना कुठेही भरतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेला जाण्यायेण्यासाठी भाडेही उपलब्ध करुन देत आहेत. तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या गरजुंना स्वखर्चाने एस. टी. प्रवासासाठी पास उपलब्ध करुन देत आहेत.
त्यांच्या या सहकार्यामुळे व योग मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ४० ते ५० तरुणांना याचा फायदा झाला असून यापैकी काही तरुण सैन्यदलात भरती झाले आहेत. जे तरुण यशस्वी होऊन भरती झाले त्यांना बोलावून घेत त्याचा सत्कार व अभिनंदन करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
तसेच मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेबांच्या धर्मपत्नी ह्या सुध्दा पोलीस स्टेशनच्या आसपासच्या लहान, लहान मुलांना व पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना बोलाऊन घेत त्यांना ज्ञानाचे व संस्काराचे मोफत धडे देत आहेत. या मुलामुलींना त्याची आई दुध पाजून भुख भागवत असली तरी भविष्यात जीवन जगण्यासाठी त्यांना वाघिणीचे दुध मात्र सौ. वाघमारे ताई पाजत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
मा. श्री. महेंद्र वाघमारे यांच्याशी हितगुज साधले असता त्यांनी सांगितले की प्रत्येकाने वाचावे, म्हणजे तो वाचेल’ हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश स्वरुपात सांगितले आहे. प्रत्येकांने वाचनाची गोडी लावून घ्यावी. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते. शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते.
तसेच प्रत्येक पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक असतात परंतु परिस्थितीमुळे त्यांना सुविधा आणि सुशिक्षित करण्यासाठी तसेच चांगले घडविण्यासाठी त्यांचे आर्थिक बळ कमी पडत असते. तरीही मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो परंतु ते परिस्थितीपुढे हतबल असतात म्हणून मी अशा घरातील होतकरु तरुणांसाठी आपणही या समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व ‘वाचाल तर वाचाल’ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात घेऊन मदत करत असतो कारण वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो, पुस्तके वाचल्याने आम्हाला असा आनंद मिळतो जो आपल्याला इतर कोणत्याही क्रियाकलापातून मिळत नाही. हे आपले ज्ञान वाढवते आणि आपली बुद्धी तीक्ष्ण करते “वाचलं तर वाचाल” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला सुविचार आपल्याला वाचनाचे महत्व पटवून देतो. आपल्या जीवनात वाचनाला खूप महत्व आहे असे मत व्यक्त केले.
तसेच मी शेतकरी कुटुंबातील महिलांचे जीवन पहात आहे. भल्या पहाटे उठून पाणी भरण्यापासून स्वयंपाक करुन मुलाबाळांना शाळेत पाठवून दिवभर शेतात राबून थकुन, भागुन घरी आलेल्या माझ्या बघिणींचा जीवन संघर्ष मी पहात आहे. या संघर्षमय जीवनातून सुध्दा या भगिनी वेळात, वेळ काढून जेव्हा आपल्या मुलांना अभ्यासक्रमाबाबत विचारता तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडून एकलेले दोन शब्द ऐकून जो आनंद त्या माता, भगिनींना होतो त्या आनंदात भर टाकण्यासाठी मी माझा रिकामा वेळ खर्ची घालून या मुलांना शिकवते हे करत असतांना मला या निरागस मुलांकडून मिळणारे प्रेम व आपुलकी यातुन मला आनंद व मानसिक समाधान मिळते असे मत सौ. वाघमारे ताईंनी व्यक्त केले.
भले तरी देऊ कासेची लंंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी |
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. वाघमारे साहेब एका बाजूला समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करत असले तरी मात्र पोलीस स्टेशनला काम करत असतांना सद् रक्षणाय, खल निग्रहणाय” या ब्रिद वाक्याचे काटेकोरपणे पालन करुन चांगल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व वाईटांना त्याची जागा दाखवण्याची धमक असलेला अधिकारी असल्याचे दिसून येते. कारण मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कामकाज हाती घेतल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. मागील हंगामात एका कापूस व्यापाऱ्यांने शेतकऱ्यांची फसवणूक पळुन जाण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा वाघमारे यांनी शिताफीने त्या व्यापाऱ्याला जेरबंद करुन शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच पिंपळगाव हरेश्वर. पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांना वठणीवर आणून कायमस्वरूपी वचक ठेवला आहे.
अशा अवलिया अधिकाऱ्यांने कायद्याची लक्ष्मणरेषा न ओलांडता एकाबाजूला जनहितार्थ कामे तर दुसरीकडे कायद्याची कडक अंमलबजावणी थोडक्यात सांगायचे झाले तर भले तरी देऊ कासेची लंंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी | अशा पध्दतीने सगळ्यांना आपलेसे करुन घेतले आहे.