भाजप म्हणजे घरात घेऊन मारणारा पक्ष, संजयदादा गरुड यांनी उताविळपणा करु नये सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२४
नुकतेच २२ जानेवारी २०२४ सोमवारी आपल्या आयोद्या नगरीत प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण भारतभर दिपावली साजरी करण्यात आली. गल्लीपासून तर दिल्ली व अयोध्येत सर्वदूर भक्तीमय वातावरणात सगळे भारतीय जात, पात विसरुन तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या उत्सवात सामील झाले होते. याच निमित्ताने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत मोठ्या मिरवणूकीत भाजपचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शेंदुर्णी नगरीत येऊन मिरवणूकीत सामील झाले होते. याचवेळी शेंदुर्णी येथील शरद पवार कॉंग्रेस गटातील संजयदादा गरुड हे ही या उत्सवात सहभागी झाले होते. याच वेळी राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक गिरीश भाऊ महाजन यांनी संजयदादा गरुड यांच्या गळ्यात भगवा रुमाल घालून सत्कार केला होता. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिक व भाविक भक्तांना आचर्याचा धक्का बसला मात्र हा धार्मिक विधी असल्याकारणाने दोघेही मातब्बर नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून गळाभेट घेतली असावी अशी चर्चा होती.
परंतु आता आगामी लोकसभेच्या तोंडावर भाजपात इनकमिंगचे वारे वाहू लागले असून राज्यात अजून बरेच ‘राजकीय भूकंप’ होतील असं म्हटलं जातं आहे. दरम्यान आज जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत, डॉ. उल्हास पाटीलांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठी हानी होईल हे निश्चित… दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी मित्र नसतो. याची प्रचिती जामनेर तालुक्यात येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकते अशी जोरदार चर्चा सुरु झाली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बहुसंख्य कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
कारण सत्ताधारी पक्षाला वठणीवर आणण्यासाठी विरोधीपक्षनेते यांची महत्त्वाची भूमिका असते व ही भुमिका बजावताना संजयदादा गरुड यांनी आजपर्यंत सत्तेची लालसा न करता जनहितार्थ संघर्ष करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचेच फलित म्हणजे संजयदादा गरुड यांना आता नुकतेच शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून दिले आहे. तसेच स्वर्गीय बापूसाहेब आचार्य गजाननराव गरुड यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत
स्थानिक शेंदुर्णी नगरपंचायतीच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवत शेंदुर्णी गावात जातीय सलोखा अबाधित ठेवला असून त्यांची ही जनहितासाठी असलेली तळमळ पाहता नक्कीच स्वर्गीय बापूसाहेब आचार्य गजाननराव गरुड यांच्या आठवणी जाग्या होतात. परंतु आता संजयदादा गरुडच भाजपमध्ये जाणार असतील तर मग सर्वसामान्य अन्याय पिडीत नागरिकांनी जायचे कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज संजयदादा गरुड यांच्याकडे सत्ता नसली तरीही समाजसेवेचा वसा हाती घेत गोरगरीबांच्या मुलामुलींना मोफत व चांगले शिक्षण कसे देता येईल सोबतच गोरगरीबांच्या सुखदुःखाची जाणीव ठेवून सतत धावपळ करत सर्वसामान्यांना अहोरात्र मदत करणारे व्यक्तीमत्व म्हणजे संजयदादा गरुड यांचे नाव घेतले जाते. तसेच आता पळवून नेलेल्या बंडखोरांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर असलेल्या भाजप, अजितदादा पवार कॉंग्रेस व शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर असलेल्या या त्रिशंकू सरकारने शेतकरी आस्मानी संकटात सापडला असतांनाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पिक विम्याची रक्कम अद्यापही बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच सगळीकडे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला असून मराठा आरक्षणावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. नोकरभरती बंद असल्यामुळे लाखो तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन सुध्दा त्यांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या जात नसल्याने बरेचसे तरुण आज वैफल्यग्रस्त जीवन जगत आहेत.
असे एक ना अनेक प्रश्न ऐरणीवर असतांनाच भाजप सरकारने विरोधी पक्ष नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून कधी ईडी तर कधी सीडीचा धाक दाखवून विरोधात असलेल्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे. असे असले तरी संजयदादा गरुड हे निष्ठावंत नेतृत्व असल्याकारणाने यांनी न डगमगता सध्यातरी पक्षांतर करु नये कारण भाजप म्हणजे घरात घेऊन मारणारा पक्ष असल्याचे मत सुज्ञ नागरिक व शरद पवार कॉंग्रेस गटातील जेष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.