सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत, लढा चालूच ठेवणार कोळी समाजाचा निर्धार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२३
सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत, लढा चालूच ठेवणार असल्याचा निर्धार आदिवासी कोळी समाजाने घेतला असून याकरिता आगामी काळात जळगाव येथे अन्नत्याग उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने आज पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे मा. श्री. प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा, भडगाव, चाळीसगाव स्तरावर बैठक घेऊन या तिघेही तालुक्यातील महिला, तरुण, तरुणी, विविध संस्था, संघटना, विद्यार्थी, पदाधिकारी व आदिवासी कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला साथ देत सर्व आदिवासी कोळी बांधवांतर्फे उपस्थित रहाणार असल्याचे घोषित करण्यात आले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आदिवासी कोळी समाजाला अनेक सोयी, सुविधा व सवलतींचा लाभ मिळालेला नाही. यामुळे मुलांच्या शिक्षणासह इतर सोयी, सुविधा मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाजाला सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे मिळवून घेण्यासाठी पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील कोळी बांधवांच्या सोयीनुसार जळगाव येथे कायमस्वरूपी जात पडताळणी समिती उपलब्ध करुन द्यावी तसेच आदिवासी कोळी समाजाच्या विकासासाठी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने त्वरित महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग उपोषण व आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मा. श्री. प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.
आजच्या या आदिवासी कोळी समाजाच्या बैठकीला पाचोरा येथील स्वामी लाॅन्स मा. श्री. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जितेंद्र सपकाळे, संभाजी शेवरे, संजय सोनवणे (चाळीसगाव), दशरथ जाधव, राजेंद्र मोरे सर (पाचोरा), मच्छिंद्र आबा चाळीसगाव, किरण कोळी, ॲड.शांतीलाल सैंदाणे, खेमचंद कोळी, नामदेव कोळी, अनिल सावळे (सामाजिक कार्यकर्ते) अशोक महाले, अशोक सपकाळे, रविन्द्र शेठ नंन्नवरे, किशोर रायसाकडा, सचिन सोनवणे, दिपक शेवरे, अनिल मासरे, अनिकेत सुर्यवंशी, रविन्द्र सुर्यवंशी, प्रविण मोरे, पप्पू कोळी, ठाकरे सर, महारु कोळी, संजय कोळी, बि. टी. बाविस्कर, संजय मासरे, भिकन कोळी शेकडो समाज बांधव उपस्थित या बैठकीचे सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी शेवरे यांनी मानले ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झली.