सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.

नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.

By Satyajeet News
January 24, 2022
465
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.

२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याने, २५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. संविधानाने आपल्याला सर्वात मोठा हक्क दिला आहे तो म्हणजे मतदानाचा.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जमीनदार, गर्भश्रीमंत अर्थात इंग्रज शासनाला आपल्या वार्षिक उत्पन्नातून तीन हजारापर्यंत महसूल देत असत, अशा लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता, त्यामुळे गरिबांचा मतदान करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु आता मात्र गरिबातील गरीब व्यक्तीच्या मतदानाचे जे मूल्य आहे, तेच मूल्य देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे मताचे आहे. म्हणूनच आपण सर्वप्रथम घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे, की त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान मतदानाचा अधिकार बहाल केला.

परंतु या अधिकाराचा वापर आपण गांभीर्याने करतो का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही सर्वसाधारण लोकशाहीची व्याख्या आहे. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. परंतु बरेच लोक मतदान करण्यासाठी उत्साही नसतात. काही महाभाग तर मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी चक्क पिकनिकचे आयोजन करतात. माझी तर इच्छा आहे, कि या लोकांना काही वर्षे उत्तर कोरिया सारख्या हुकूमशाही देशांमध्ये वास्तव्यास पाठवले पाहिजे. तेव्हा यांना मतदानाचे महत्त्व कळेल.

आपले मत कोणालाही असो आपण कर्तव्य म्हणून मतदान केलेच पाहिजे. ते कर्तव्य कोणत्या पक्षाप्रती, कोणत्या उमेदवाराप्रती नसते, तर ते आपल्या स्वतः प्रति असते. कारण निवडून दिलेला उमेदवाराच्या माध्यमातून आपण स्वतः तथा इथला प्रत्येक नागरिक अप्रत्यक्षपणे राज्यकारभार करत असतो. म्हणूनच आपल्या हितासाठी मतदान हे केलेच पाहिजे. त्यामुळे पुढचे पाच वर्षांचे आयुष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते. कारण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि देशाच्या हिताचा विचार होईल. बऱ्याच वेळा आपण एकट्याने मत न दिल्याने असा कोणता मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारे या देशात बरेच जण आहेत. पण असा विचार आत्मघाती आहे.

आपल्या एका मताने ही फरक पडू शकतो! हे लक्षात घेतले तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. हल्ली काही जण आपले मत विकायला लागले आहेत. मत विकणे म्हणजे आपल्या स्वतःला विकणे,आपल्या स्वाभिमानाला विकल्या सारखं आहे. अशाच प्रकारे मत विकण्याची सवय वृद्धिंगत होत गेली, तर या देशात हुकूमशाहीचा जन्म होईल आणि भविष्यात मोठी अराजकता माजल्या शिवाय राहणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. विशेष करून तरुणांनी याकडे अत्यंत गांभीर्याने बघितले पाहिजे त्यांनी आपल्या स्वतःसहं समाजामध्ये मतदानाबद्दल जनजागृती घडवून आणली पाहिजे. सुदृढ व सक्षम लोकशाही निर्माण करण्यासाठी मतदान हे केलेच पाहिजे. ही विचारधारा प्रत्येकाने जोपासली पाहिजे. जे भावी मतदार आहेत किंवा ज्यांनी वयाची अठरा वर्षे नुकतीच पूर्ण केली आहे, अशा तरुणांनी तर एक देश सेवा मानून मतदान जागृतीसाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे.

कारण लोकशाही देशात युवक हा महत्त्वाचा व जबाबदार घटक आहे. युवकांमध्ये लोकशाही पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे, व त्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. आज सुदैवाने भारतीय लोकशाही समोर असणारी आव्हाने पेलण्यास भारतीय युवकांमध्ये क्षमता आहे. त्यांनी आपली क्षमता लक्षात घेऊन आव्हानांचा स्वीकार करून लोकशाहीच्या माध्यमातून एक सशक्त आणि बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

जय हिंद जय भारत

पोलीस नाईक विनोद अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९
लेखक~जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक/कवी आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 76
Previous Article

गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन “प्रतिभा संगम-२०२२” ...

Next Article

गोदातीरावरील ३०० देवस्थानांच्या पुनर्वैभवासाठी प्रवरासंगमपासून धोत्रेपर्यंत रस्ता ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    खरकटे वेचवया गेले ते कावळे, रणीझुंजाया राहीले ते मावळे.

    July 20, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जामनेर व पाचोरा तालुक्यात धर्मस्थळांवर अंधश्रद्येचा बाजार, अंधश्रद्धा निर्मुलन समिती लक्ष देईल का ?

    February 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भ्रष्टाचारी तुपाशी तर आंदोलनकर्ते उपाशी. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील यांचे बेमुदत ...

    August 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग.सलग तिस मिनीटे स्केटिंग करून केला विश्वविक्रमात सहभाग.

    June 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली विकासकामांची शपथ राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा+भडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजना मार्गदर्शन शिबीर

    November 11, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    निसर्गाच्या ढसाळ वातावरणात वरखेडी येथील चक्री वादळावर पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घातला पायबंद.

  • Uncategorized

    पाचोरा ते अंबे वडगाव १६ किलोमीटर अंतराच्या दरम्यान २२ गतिरोधक अपघाताची मालिका सुरुच.

  • राजकीय

    पाचोरा-भडगाव शहराच्या विकासासाठी भरवी निधी देण्याचा नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन. आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज