जामनेर तहसीलदारांचा ‘आगळे’ वेगळा कारभार, सर्वसामान्य जनता झालीय बेजार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२३
तहसीलदार हे पद म्हटलं म्हणजे अतिमहत्वाचे पद कारण तालुक्यातील सर्व भु संपत्तीचा थोडक्यात सांगायचे झाले तर जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी म्हणजे सर्वदूर असणाऱ्या मालमत्तेचे अधिकार घेऊन बसलेला अधिकारी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. परंतु या पदावर असलेला अधिकारी हा जनतेचा सेवक असतो परंतु एखादा अधिकारी जर हे विसरुन त्याच्या हाती दिलेल्या पदाचा दुरुपयोग करुन पदाच्या गुर्मीत जनतेची सेवा करण्याऐवजी स्वताच्या फायद्यासाठी जनतेला वेठीस असेल तर मग संबंधित अधिकाऱ्याला त्याची जाणीव करुन देणे हे गरजेचे असते.
म्हणून असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात मा. तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या कार्यकाळात
सुरु असल्याच्या वाढत्या तक्रारी जामनेर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून समोर येत असून या बाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करुनही काहीएक फायदा होत नसल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच जामनेर तहसील कार्यालय हे दलालांच्या विळख्यात सापडले असल्याने ‘जो देईल दाम त्याचेच होईल काम’ अश्या पध्दतीने कामकाज सुरु असून ज्यांच्या कागदावर वजन आहे ती कागदपत्रे खरी की खोटी, योग्य की अयोग्य हे न पहाताच सह्या केल्या जातात मात्र ज्या कागदावर वजन नसेल किंवा मध्यस्थीसाठी दलाल न घेता स्वताहून थेट कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी गेले असता कागदपत्रांची पूर्तता केली असल्यावरही मुद्दामहून त्रुटी (क्युरी) काढून कागदपत्रे परत पाठवली जातात किंवा बरेच दिवस कागदपत्रे तशीच धुळ खात पडून राहत असल्याने गरजूंना वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत.
मा. तहसीलदार नानासाहेब आगळे साहेब हे पदाचा दुरुपयोग करुन मनमानी कारभार करत असल्याने तहसील कार्यालयातून १५५ प्रमाणे ऑनलाईन ७/१२ उतारे दुरुस्तीसाठीचे काम दोन, दोन महिने केले जात नाही. तसेच कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता प्रत्येक विषयावर चर्चा करा असा रिमार्क मारुन नहाकच त्रास दिला जातो. विशेष म्हणजे जी कागदपत्रे नियमानुसार कायदेशीर आहेत अश्या ही कागदपत्रांवर सह्या केल्या जात नाहीत. तसेच ग्रामीण भागातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्ण माहिती नसल्याने त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा माहिती न देताच प्रत्येक वेळी वेगवेगळ्या त्रुटी काऊ कार्यालयातून बाहेर काढले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तहसीलदार मा. नानासाहेब आगळे हे येथेच थांबले नाहीत तर त्यांचे सहकारी मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरुन थोड्या, थोड्या विषयावर कार्यालयात सर्वांसमोर वाद घालतांना दिसून येतात असेही अशी माहिती समोर येत असून काही गरजवंत लोक वेळेवर कागदपत्रे मिळवून घेण्यासाठी वैतागून सरतेशेवटी थेट तहसीलदार मा. नानासाहेब आगळे यांची भेट घेऊन कागदपत्रे पुर्ण असतांनाही कामे का होत नाहीत असे विचारतात तेव्हा यावर चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल असे सांगून चर्चा करतात मात्र सर्व बाबींची पूर्तता केल्यावरही योग्य वेळी योग्य ती कागदपत्रे मिळत नसल्याचे त्रस्त लोकांनी सांगितले आहे.
तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या सोडविण्यासाठी काही अर्जफाटे केले आहेत परंतु अर्जदार (तक्रारदार) व ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे अश्या गैर अर्जदाराला बोलावून निर्णय देणे क्रमप्राप्त असतांनाही बऱ्याचशा प्रकरणांमध्ये दलांलामार्फत सेटिंग करुन निर्णय दिले जात असल्याने या तहसील कार्यालयात खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे केले जाते असेही काही त्रस तक्रारदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून सांगितले आहे. तसेच शासनाची म्हणजे महसूल विभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेता किंवा रॉयल्टी न भरताच जामनेर तालुक्यातील शासकीय भुखंडावरुन मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन मुरुम, माती व दगडाची उचल केली जात असल्याने एका बाजूला गावठाण, गायराण जमीन नष्ट होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतांना या गौण खनिज उत्खननाकडे अर्थपूर्ण डोळेझाक केली जात असल्याची चर्चा जनमानसातून ऐकावयास मिळत आहे. महत्वाचे म्हणजे शेत जमीन बिगरशेती करतांना कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा शहानिशा न करताच आर्थिक देवाणघेवाण करुन सुपीक अश्या शेतजमिनीचे बिगरशेतीत रुपांतर केले जात असल्याचे जनमानसातून सांगितले जात आहे.
यावरुन जामनेर तालुक्याचे तहसीलदार मा. नानासाहेब आगळे हे स्वताला जिल्हाधिकारी समजून वागत असल्याचा अनुभव जनतेला येत असल्याने तसेच गोरगरीब, शेतकरी व इतर गरजवंताला तहसीलदार हे विनाकारण वेठीस धरत असल्याने थोड्या, थोड्या किरकोळ कामासाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही गरजवंताला आर्थिक फायद्यासाठी हेतुपूरस्कर प्रकरणावर सह्या न करता वेठीस धरतात व यामुळे गरजवंताला हातचे काम सोडून आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो अश्या तक्रारीही केल्या जात आहेत.
कायदा आमच्या बापाचा समजणाऱ्या अशा या तहसीलदारांची चौकशी होऊन त्वरित बदली करण्यात यावी याकरता एक त्रस्त शेतकरी व सर्वसामान्य नागरिक लवकरच मंत्री नामदार मा. श्री. गिरीशभाऊ महाजन व जिल्हाधिकारी मा. श्री आयुष्य प्रसाद साहेबांची भेट घेऊन मागणी करणार आहेत. कारण तहसीलदार मा. नानासाहेब आगळे यांनी स्वमर्जीने वेगळे कायदे तयार केले आहेत की काय अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.