जामनेर येथे शिवसेनेचे उपनेते शेख अल्ताफ भाई यांच्या हस्ते, चालक, मालक वाहतूक शाखेचे उद्घाटन संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२४
जामनेर शहरात काल दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी वाहन चालक, मालक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दिपकसींग राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख उध्दव भाऊ मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेनेचे उपनेते शेख अल्ताफ भाई तसेच उत्तर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजीम सय्यद भाई यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने वाहन चालक व मालक उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जामनेर तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर दादा बोरसे, इसामुद्दीन शेख इस्माईल, शिवसेना शहरप्रमुख उस्मान मामु, वाहतूक सेनेचे अध्यक्ष शेख जमील शेख रसुल, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेख हनीफ शेख मुनीर, सचिव अहमद जनाब, शेख उस्मान, इस्माईल भाई, लोहारा येथील अफजल भाई पठाण, सलीम भाई, शेख सईद, शेख इमरान, संजय पाटील व वाहतूक सेवेचे असंख्य चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*************************************************************
ॲड. ज्ञानेश्वर दादा बोरसे.
*************************************************************
वाहन चालक व मालक हे सद्यस्थितीत खुप बिकट परिस्थितीत आपला व्यवसाय सांभाळत आहेत. विशेष म्हणजे या वाहन चालक व मालिकांमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. यामागील कारण म्हणजे चांगले शिक्षण घेऊनही योग्य वेळी योग्य वयात नोकरी मिळत नसल्याने उदरनिर्वाह चालवण्यासाठी या तरुणांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. परंतु या महागाईच्या काळात तसेच व्यवसायात वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यातल्या त्यात सरकारने अजून यात हिट अँड रन कायदा लागू करुन वाहन चालक व मालकांच्या समोर एक मोठी समस्या निर्माण केली आहे.
कोणताही वाहन चालक हा मुद्दामहून अपघात करत नसतो वाहान निर्मिती झाली तेव्हाच अपघात अटळ असल्याचे गृहीत धरुन योग्य कायदे बनवले आहेत. परंतु आता मालक व चालकांशी कोणत्याही चर्चा न करता जागेवर बसून हा कायदा बनवला असल्याचे सांगून हा कायदा लागू करु नये असे मत व्यक्त केले. तसेच वाहन मालक हे वाहन घेतांनाच शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सगळे कर (टॅक्स) भरतो परंतु शासनाकडून वाहन मालक व चालकांना पाहिजे त्या सुविधा शासनातर्फे देण्यात येत नाहीत. हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करतांना वाहन चालकांना विश्रामगृह नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून एक तर रस्त्यावर थांबावे लागते नाहीतर स्वखर्चाने कुठेतरी वाहनतळावर पैसे देऊन मदत घ्यावी लागते. आजच्या महागाईच्या काळात मालकांना मिळणारे अल्पभआडए व चालकांना मिळणारा तुटपुंज्या पगारात हा खर्च करणे परवडणारे नसल्याने शासनाने रस्त्यावर ठिकठिकाणी वाहन चालक व मालिकांसाठी विश्रामगृह उभारावेत तसेच रस्त्यावर वाहतूक शाखा व इतर ठिकाणी पोलीसांकडून वाहन अडवून नको ते प्रश्न उपस्थित करुन पैसे उकळले जातात हा प्रकार बंद झाला पाहिजे असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले.