राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव ओबीसी सोबतच आमदार रोहित दादा पाटील पवार यांचे प्रतिपादन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२३
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव ओबीसी सोबतच आमदार रोहित दादा पाटील पवार असे प्रतिपादन दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी जळगाव येथील ओबीसी हितगुज चर्चा सत्र कार्यक्रमात रोहित दादा पवार यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलत बोलत असतांना केले,
यावेळी देशाच्या आणि राज्याच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक जडणघडणीमध्ये ओबीसी समाजाचा मोठा वाटा असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव ओबीसी समाजासोबत राहील असे मत आमदार रोहित दादा पवार यांनी केले मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी होऊ घातलेल्या सन्मान सभे निमित्त देशाचे नेते शरद पवार साहेब यांची जळगाव येथे सभा होत असून त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार हे जळगाव येथे आले आहे. ओबीसी हितगुज चर्चासत्राचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केले होते.
यावेळी ओबीसी सेलचे प्रांताध्यक्ष राज राजापूरकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, सोशल मीडियाच्या प्रमुख कविता म्हेत्रे, डॉक्टर नलीन महाजन, ओबीसी महानगर महिला जिल्हाध्यक्ष पुनम खैरनार, ऍड वैशाली महाजन हे सर्व विचार पिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी सांगितले की ओबीसी समाज राज्यांमध्ये मोठा असून या समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी, लवकरात लवकर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या रखडलेल्या निवडणुका व्हाव्या तसेच ओबीसी समाजाच्या बंद केलेल्या शिष्यवृत्ती पुन्हा सुरू व्हाव्या अशा मागण्या त्यांनी केल्या.
कार्यक्रमाचे आयोजक शालिग्राम मालकर बोलतांना म्हणाले की आदरणीय पवार साहेबांमुळे आम्हा ओबीसींना कुठल्याही प्रकारचा संघर्ष व आंदोलन न करता आरक्षण मिळाल्यामुळे आम्ही सर्व ओबीसी एकजुटीने आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत राहणार आहोत १९९३ साली मंडल आयोग लागू करून पवार साहेबांनी देशात धाडसी निर्णय घेतला त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज सदैव शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते यात प्रामुख्याने प्रा भीमराव महाजन सर, सुवर्णा पवार, रेखा जाधव, टी एस माळी, भास्कर पाटील, अंतू लहासे, हरिष जाधव योगेश बनकर, ज्ञानेश्वर करवंदे, व्ही व्ही एस संघटनेचे अध्यक्ष संजयभाऊ शिरसाठ, जनजागृती संघटनेचे महाराष्ट्र संघटक श्री रामभाऊ सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बाविस्कर सर यांनी केले तर आभार महेंद्र पाटील सर डोकलखेडा यांनी मांडले.