वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे, मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२३
पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ०५ सप्टेंबर या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिक्षण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या शिक्षक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रामाला दिपप्रज्वलन करुन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच कला शिक्षक मा. श्री. शैलेश कुलकर्णी यांनी साकारलेल्या कलेचे सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण पाहून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मा. श्री. शैलेश कुलकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले.
“वाचाल तरच वाचाल, नाहीतर खचाल” सौ. वैशालीताई सुर्यवंशी.
——————————————————————-
आज जीवन गतिमान झाले. कामे खूप झाली आहेत यामुळे वेळ कमी पडतो या सबबीखाली बरेच लोक साहित्याला पारखे झाले आहेत. वाचायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्यांच्या कडे वेळ आहे असे लोक सुध्दा वाचत नाहीत. वाचनाचा कंटाळा येतो म्हणून बरेच लोक वाचत नाहीत. पुस्तके ज्ञानरंजक असतात. परंतु ज्ञान व मनोरंजन करण्यासाठी पुस्तकाला पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे टि. व्ही, मोबाईल, इंटरनेटसह संगणक, चित्रपट गृह, पंच तारांकित होटल, पब्स, विविध क्लब्स इत्यादी माध्यमांनी पुस्तकांची जागा घेतली. त्यामुळे ‘हल्ली वाचन संस्कृती उरली नाही’ असे सर्वत्र ऐकायला व पहावयास मिळते आहे. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे थिएटर, पब्स, इंटरनेट कॅफे, टि. व्ही. वरील कार्टून किंवा रियालिटी शो चे आकर्षण वाढत असल्याने तसेच टि. व्ही. वर दाखवले जाणारे क्रिकेट सामने बघण्यासाठी परिक्षेच्या काळातही तरुण पिढी तासंतास टि. व्ही. समोर बसून असते यामुळे अश्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. तसेच काही शोधायचे झाल्यावर ते वाचनातून न शोधता गुगलने एका क्षणात सर्च केले जात आहे. या विविध सुविधा उपलब्ध झाल्याने आत्ताची तरुण पिढी वाचनापासून दुर गेल्याने वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे. परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनापासून दुर गेलेल्या मुला, मुलींना वाचनाची गोडी लागली पाहिजे तसेच वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देत शिक्षणासोबतच संस्काराचे धडे दिले पाहिजेत. सोबतच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत.
हे करत असतांनाच विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी, सुदृढ होण्यासाठी मैदानी खेळांना महत्व देत व्यायामाचे धडे दिले पाहिजेत म्हणजे मुलांमध्ये सशक्तीकरण होऊन सर्वांगीण विकास साधला जाईल आजच्या या तरुण विद्यार्थीच्या भरवशावर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. व विद्यार्थ्यांना घडवून नाविन्यपूर्ण पिढी घडविण्याचे सामर्थ्य आजच्या शिक्षकांमध्ये असल्याचे मत आपल्या मनोगतातून व्यक्त करत शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, शाळेचे जनसंपर्क अधिकारी शाही जोसेफ तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी जकातदार यांनी केले तर आभार सौ. सोनाली बोरसे यांनी अभिव्यक्त केले.