पौष्टिक आहाराशिवाय उपनिषद समजने कठीनच, मा. श्री. के. एफ. पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वरखेडी (भोकरी) येथील पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक मा. श्री. पुरुषोत्तम सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी मा. श्री. रमेश जाधव साहेब व पिंपळगाव हरेश्वर दोनचे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील साहेब यांनी पौष्टिक आहाराचा प्रसार दिनानिमित्त आजच्या लहान, लहान बालकांना व तरुण पिढीला पौष्टिक आहार व बदलती जीवनशैली या विषयावर तसेच सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी वरखेडी येथील पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मा. श्री. रमेश जाधव यांनी मानवाच्या जीवनात आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये ज्वारी, बाजरी, वरी, हरीक मिलेट्स यांचे किती महत्त्वाचे आहे पटवून दिले व आजकाल बाजारात मिळणारे फास्ट फूड न खाण्याचा सल्ला दिला.
तसेच आजच्या पिढीला पौष्टिक आहाराशिवाय उपनिषद समजने कठीनच असल्याचे मत पिंपळगाव हरेश्वर दोनचे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील यांनी व्यक्त केले व मानवी शरीरातील आवश्यक असणारा प्राणवायू, पाणी, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, मेद यासोबतच सर्वप्रकारची जीवनसत्त्व, मुलद्रव्य या घटकांचा संतुलित आहार घेतल्यास आपण निरोगी व ठणठणीत राहु शकतो तसेच निसर्गाने आपल्याला प्राणवायू व पाणी ही मोफतची अमुल्य अशी देणगी दिली आहे परंतु सद्यस्थितीत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, दळणवळणाची वाढती सुखसुविधा व वाढत्या लोकसंख्येमुळे व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे झपाट्याने वाढत चाललेली सिमेंटची जंगलं, कारखाने यामुळे वारेमाप होत असलेली वृक्षतोड व प्रदुषण लक्षात घेऊन निसर्गसंपदा जोपासण्यासाठी आपण वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच प्रत्येकाने एक व्यक्ती एक झाड ही मोहीम राबवली पाहिजे तरच आपल्याला शुध्द हवा, मुबलक पाणी मिळेल व आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी मदत होईल.
सुदृढ व निरोगी शरीर ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. कारण संतुलित व पौष्टिक आहार हा बुध्दी विकासाचा मुलभूत स्रोत आहे व यातूनच उत्तमरीत्या उपनिषद समजू घेता येईल व यातुनच स्वताचा विकास साधला गेला म्हणजे आपोआपच देशाचा विकास साध्य होईल यात तिळमात्र शंका नाही.
म्हणून लहान, लहान मुले, तरुण मुले तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींनी फास्ट फूड व जंक फूड तसेच गव्हाची चपाती किंवा आता नवीन जीवनशैलीत मैद्याची चपाती म्हणजे (तंदुरी) रोटी खावून मिळणार नाही. यातुन मिळणारे ग्लुटेनाईट हे शरीराला अपायकारक असून स्थूलपणा वृध्दीस तारक आहे. याकरिता आपल्या आहारात ज्वारी, बाजरी, वरी, हरीक, भगर ही शरीराला कार्बोदके देणारी तसेच मेद व प्रथिनांसाठी डाळवर्गीय धान्य, मुलद्रव्य भाजीपाला, मांस यापासून मिळणारे जीवनसत्त्वे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत. यासाठी नगदी पिकांसोबतच वरकस जमिनीमध्ये पौष्टीक तृणधान्य घेणं गरजेच आहे जेणे करुन शरिर संवंर्धन होईल. असे प्रतिपादन मा. श्री. के एफ. पाटील यांनी केले.
या संकटांनो या, तुमचा बाप येथे उभा आहे.
असे अनेक संकटावर झळणाऱ्यांचा, मी वारस आहे.
“शेतकरी आहे मी शेतकरी आहे”
(संतोष पाटील. आदर्श शेतकरी अंबे वडगाव.)
शालेय विद्यार्थ्यांनी आपला बाप शेतकरी आहे तो फक्त शेतकरीच नसून या जगाचा पोशिंदा आहे. तो रात्रंदिवस शेतात घामाचे पाणी करुन स्वताच दुःख विसरुन फाटक्या कपड्यात हातावर तिखट, भाकरी खाऊन राब, राब राबतो व उराशी स्वप्न बाळतो की आपला मुलगा, मुलगी शिकुन मोठे होऊन कुठेतरी नोकरीला लागतील व म्हातारपणी आम्हाला दोन घास सुखाचे खायला मिळतील म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो मोबाईल, टि. व्ही. च्या लांब राहून अभ्यास करा व आईवडीलांचे स्वप्न साकार करा व सुटीच्या दिवशी तसेच गरज असेल तर इतर दिवशी आईवडिलांसोबत शेतात जाऊन त्यांना मदत करा म्हणजे आपले आईवडील किती कष्ट करतात हे लक्षात येईल व चांगले शिक्षण करुन जर नोकरी नाही मिळाली तरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा फायदा होईल. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे म्हणतात म्हणून खुप शिका, फास्ट फूड, जंक फूड यांच्यापासून दूर राहून पौष्टिक आहाराचा अवलंब करा व निर्व्यसनी रहा म्हणजे सुदृढ आरोग्य असल्याने आपली स्वताची व देशाची प्रगती झाल्याशिवाय रहाणार नाही. तसेच प्रत्येकाने एक तरी वृक्ष लागवड करुन ते जोपासण्यासाठी संकल्प करा आपल्या देशाचे भविष्य शेतकरी व तरुणांच्या हातात आहे. म्हणून आपण “जय जवान, जय किसान” या घोषणा देत असतो असे प्रखर मत प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
“मुख्याध्यापक मा. श्री. पुरुषोत्तम सुर्वे”
आपल्या जीवनात आहारशास्र,हशेतीची दिशा आणि दशा याबाबतची जागृकता आणि आपली कर्तव्य याचा परामर्श घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. चव्हाण सरा तर आभार प्रदर्शन मा. श्री. कोळी सरांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक भोई (खडकदेवळा), निलेश पाटील. (लोहारी), दिप चौधरी.(कोल्हे) व कृषि सहाय्यक बांधवांनी अथक परिश्रमाने घेतले.