ही छिनाल व्यवस्था अन,हे भाडखाऊ सरकारं,अजून किती शेतकर्यांचा जीव घेईल ? संतोष पाटील

दिनांक~३०/०८/२०२२
ही छिनाल व्यवस्था अन,हे भाडखाऊ सरकारं,अजून किती शेतकर्यांचा जीव घेईल ?
संतोष पाटील
————————————–
मित्रहो असे किती अधिवेशन आलेत आणि गेलेत मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार विनिमय होऊन किंवा चर्चा करून कुठलाच तोडगा निघाला नाही, किंवा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही ,अधिवेशनात जो तो आपल्या पक्षाची बाजू सरस आम्हीच खरे आहोत बाकी सगळे खोटे असं म्हणत वेळ मारून न्यायचा प्रयत्न करत आहे, आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे गरिबांचे वंचितांचे व सुशिक्षित बेरोजगारांचे अनेक असे प्रश्न आणि अडचणी आ वासून उभे आहेत, काल परवा मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केली सुभाष भानुदास देशमुख उस्मानाबाद असे या शेतकऱ्याचे नाव आहे, या वीरांच्या ,शुरांच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाच्या महाराष्ट्र मध्ये, महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती यावी यावर विश्वास बसत नाही. आपण कुठे चाललोय आहे हेच कळत नाही माझा राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वर्गातून हे सारे पाहून दुःख होत असेल रयतेचे राज्य स्थापन करून, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू न देणाऱ्या लोक कल्याणकारी राज्यात हे काय चाललंय, पक्ष वाढी शिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही सत्तेसाठी आसुसलेले हे लोकं पाषाणी काळजाची झाली आहेत, संपूर्ण देशातील शेतकरी संकटात सापडला पुढे काही दिसत नाही चिंतातुर झालेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतोय, या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही आधीच्या सरकारने महापुरुषांची नावे देऊन खोटी कर्जमाफी केलेली, कर्जमाफी च्या नावाखाली राज्य लुबाडूण घेतलं, त्याच्यानंतर बंडखोरांचे सरकार आलं हेही सरकार महाठक निघालं. निवडणुकीच्या अजेंडा मधून शेतकरी गायब झाला त्याच दिवशी शेतकरी पूर्णपणे संपला, ज्यांनी किंवा त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे केले आज तेच गळा काढून म्हणत आहेत की हे कायदे रद्द करा ,खरं म्हणजे सर्जकाच्या विरोधात कायदे करण्याची गरजच काय जो भाकरीचं झाड लावून जगाचं पोट भरतो स्वतःच्या घामानं त्याची जमीन पिकवतो ,अपराध्यासारखे लाजीरवाण जिणं त्याच्या नशिबी याव याहून दुसरं दुर्दैव काय असेल, शेतकऱ्यांची पोर वैफल्यग्रस्त झाली आहे या पोरांना सावरण्यासाठी एकत्रित आणण्याची गरज आहे, त्यांना या राजकीय पक्षांच्या विळख्यातून सोडवून बापाच्या मारेकऱ्यांची झेंडे खांद्यावरून फेकून कसे देता येतील हे समजावून सांगून सगळ्यांना मायच्या पदराखाली एकत्र आणणं ही आता काळाची गरज झाली आहे, जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, म्हणून आपण आता सर्वांनी गटतट विसरून एकत्र यायचे आहे मित्रहो फक्त एक वेळेस एकत्र या मग काय होतं ते पहा आपण एकत्र आलो नाही तर आपला नाश ठरलेलाच, एकत्र येण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतील आणि एकत्र राहून शेतकरी ही जात निर्माण करून आपल्याला या देशांमध्ये सुखासमाधानानं जगता येईल.
संतोष पाटील
7666447112