पिंपळगाव हरेश्वर येथील गुरु गोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शालिग्राम मालकर यांचा राजीनामा यांचा राजीनामा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२३
पिंपळगाव हरेश्वर येथील गुरु गोविंद सोसायटीचे चेअरमन मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी दिनांक २४ मे २०२३ बुधवार रोजी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज कडून थेट मा. श्री. शालिग्राम मालकर यांच्याशी संपर्क साधुन संवाद साधला असता त्यांनी आपण राजीनामा का दिला याबाबत सविस्तर खुलासा दिला आहे.
तो असा आमच्या गुरु गोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा कारभार खेळीमेळीच्या वातावरण सुरु आहे. सोसायटीची निवडणूक पार पडल्यानंतर सर्व समाजातील समाजबांधवांना संधी मिळावी म्हणून चेअरमनपदी एक वर्षाचा कार्यकाळ व व्हाईस चेअरमन प्रत्येकी अडीच वर्षांचा कार्यकाळ ठरवण्यात आला आहे. या ठरलेल्या बोली प्रमाणे मी मागील २७ मे २०२२ रोजी चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती. या एक वर्षाच्या कार्यकाळात स्वस्त धान्य दुकानाला आय. एस. ओ. नामांकन मिळवला तसेच सोसायटीच्या दुकानातून रासायनिक खतांची विक्री दीडपट वाढवून थकबाकी वसुली करत सोसायटी तफावतीत जाऊ दिली नाही. व आता माझा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या २७ मे शनिवार रोजी संपणार असल्याने मी २४ हे बुधवार रोजी राजीनामा दिला कारण दुसऱ्या सभासदांना संधी मिळाली पाहिजे हा यामागचा हेतू आहे. असे सांगितले आहे.
यांनी दिलेल्या खुलाश्यामुळे पिंपळगाव हरेश्वर गाव, परिसरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आजच्या मिटींगमध्ये मा. श्री. शालिग्राम मालकर यांचा राजीनामा मंजूर होऊन त्या जागी पुढील काळात नवीन चेअरमनची निवड होण्याची शक्यता आहे.