सरदार कंपनीच्या खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२३
मे. सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मोरबी, गुजरात या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या वापरामुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याबाबत दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी, जळगांव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद जळगांव, जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगांव, जिल्हा व सत्र न्यायाधिश, जळगांव व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव व कृषि विकास अधिकारी, जिल्हापरिषद जळगांव यांच्यात झालेल्या चर्चेनुसार उपरोक्त विषयान्वये मे. सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मोरबी, गुजरात या कंपनीचे खत वापरामुळे आपल्या जळगाव जिल्हा व तालुक्यातील शेतकरी बांधवांचे मोठयाप्रमाणात पिकांचे नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारीची दखल घेत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारींचे अवलोकन करुन कृषी अधिकारी व इतर यंत्रेणे मार्फत शेत शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सर्व बाधित पिकांना मे. सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मोर्सी गुजरात या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरले असल्याचा समान दुवा आढळून आला असल्याचे नमूद करत हे खत वापरल्यानंतर तणनाशक फवारणीनंतर दिसणाऱ्या विकृती सारखी लक्षणे म्हणजे कापूस पिकाची पाने निमुळती, जाडसर, लांबट होऊन शिरा फुगीर झाल्याचे तसेच कापूस पिकाची वाढ खुंटल्याचे आढळून आल्याने बाधित कापूस पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत शेतकऱ्यांची फसवणूक व शेतमालावर विपरीत परिणाम झाल्याचे नमूद केले करत याप्रकरणी कृषि विभागामार्फत जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ३३०, दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे.
तसेच जिल्हयातील जामनेर, पाचोरा, बोदवड, अमळनेर, धरणगांव, जळगांव, पारोळा, यावल, चोपडा २. तालुका कृषि अधिकारी, जामनेर, पाचोरा, बोदवड, अमळनेर, धरणगांव, जळगांव, पारोळा, यावल, चोपडा या बाधीत गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनी विरुध्द गांवनिहाय एक पोलीस केस दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी. त्यानुसार आजपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्हयातील १०४१.११ हे. क्षेत्रावरील ९ तालुक्यातील १०३ बाधीत गावांतील प्रति गांव एका शेतकरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करेल व इतर बाधीत शेतकरी सहभागी असतील. याबाबत तालुकास्तरावरील कृषि विभागाचे अधिकारी संबधीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पोलीस यंत्रणेसोबत कारवाई करतील. सर्व बाधीत गावांत कंपनीविरुध्द पोलीस केसेस दाखल करण्यात येऊन त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. अशा आशयाचे पत्र कृषी विकास अधिकारी जिल्हापरिषद जळगाव यांनी जारी केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.