स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईने स्वताची किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म कुऱ्हाड येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२२
वुमन इज दी नोबलेस्ट क्रिएशन ऑफ गॉड’, असे एका पाश्चात्य तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे. स्त्रीच्या मातृरूपाला स्मरूनच त्यांनी हे उद्गार काढले असावे. जगातल्या सर्वच संस्कृतींनी बाळाला जन्म देणारी आई हे सृष्टीचे सर्वश्रेष्ठ रूप मानले. विश्वात जे जे मंगल, उदात्त, पवित्र, भव्य, दिव्य ते ते सर्व मातृरूप होऊन प्रकट होते. प्रातःकाली पूर्व क्षितिजावर प्रकटणारी उषेची सुवर्णप्रभा म्हणजे, ‘अदिती’. अदितीचा पुत्र म्हणून सृष्टीकर्त्या सूर्याला आदित्य म्हटले जाते.
मा’ म्हणजे आई. ब, बये, माय, माता, माये, माऊली, मातोश्री, जननी, जन्मदात्री असे अनेक शब्द आईसाठी उच्चारले जातात. माता ही बाळाचे सर्वस्व असते. गर्भात असल्यापासून मूल मातेवर अवलंबून असते. तिचे रुधिर, अन्नरस सिंचूनच त्याचे पोषण होते. आपल्या गर्भाच्या सुरक्षित कवचात सांभाळून प्रत्यक्ष जगण्यातल्या दगदगीत ती त्या मांसाच्या गोळ्याचे संरक्षण करते. जीवांचे सातत्य राखण्यासाठी निसर्गाने मातेवर दाखविलेला हा प्रचंड विश्वास असतो. माता हा विश्वास फोल ठरू देत नाही. प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावूनही ती त्याचे संरक्षण करते. प्रसूतीच्या मरणप्राय वेदना सहन करून ती बाळाला जन्म देते. जन्म घेतल्यावर त्याची पहिली ओळख मातेशीच होते. आपल्या मऊ-मुलायम स्पर्शाने ती त्याला आंजारते-गोंजारते. या स्पर्शातून त्याला जगण्याची ऊर्जा आणि आश्वासकता प्राप्त होते.
हळूहळू मोठे होत असतांना त्याचा विश्वाशी संपर्क येतो. आई त्याला खाऊ घालताना चिऊ-काऊची ओळख करून देते. ही चिऊ-काऊची ओळख पिलांच्या आया म्हणूनच होत असते. आई त्याला आकाशातला चांदोबा दाखविते. आईचा भाऊ म्हणून तो त्याचा मामा असतो. आईच्या नात्याशी जुळूनच हे शिशुमन भोवतालचा अनुभव घेत असते. याच वयात बालकाच्या नेणिवा दृढ होत असल्याने नेणिवेत मातेचा आदिबंध स्थिरावतो आणि सर्जक, संरक्षक म्हणून हा आदिबंध विकसित होतो.
मातेच्या या आदिबंधाला प्राचीन साहित्यात, पारंपरिक लोकवाङ्मयात फार महत्त्वाचे स्थान आहे. ‘परंजाने माता तद्नुसरण क्लेश हरणम'(हे माते तुला शरण आल्याने क्लेशाचे हरण होते.) अशी मातेची आळवणी केली जाते.
माता मानवाची असो वा पशुपक्ष्यांची; तिच्या अंतरी लेकराप्रतीचे ममत्व ओतप्रोत भरलेले असते. जहर ओकणारी नागीन असो, वा कडकडून चावा घेणारी मुंगी; त्यांच्यातील मातृत्व मात्र सदैव जागृत असते. उंच आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारीचेही लक्ष आपल्या पिलांवर असते. बछड्याने कासेला तोंड लावल्याशिवाय गायीला पान्हा येत नाही. माकडीन आपल्या पिलाला पोटाशी धरून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते. आपल्या नवजात शिशुच्या मानेला दातही न रोवता कुत्री-मांजरी इकडून तिकडे नेतात. अंडी ऊबविण्यासाठी आणि नवजात पिलांच्या निवाऱ्यासाठी पक्षीण इवल्याशा चोचीने काडीकाडी जमवून घरटे तयार करते. पिलांना ‘आपल्या पायावर उभे केल्या’वर प्राण्यांमधील मातृत्वाची जबाबदारी संपुष्टात येते. मातेचे नातेही संपते.
पण मानव हा भावनाशील आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचा प्राणी आहे. कुटुंब, समाज आणि संस्कृतीमुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होते. असे म्हणतात की मातेनेच आपल्या अपत्याला सुसंस्कारित करतांना या संस्थांची निर्मिती केली. बाळाशी तिचे नाते आजन्म अभेद्य असते. आपल्या लेकरासाठी कष्ट, यातना सोसते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या लेकरावर निरातिशय प्रेम करते. लेकराला मांडीवर खेळवताना, हाताच्या झुल्यावर झुलवताना तिला कसलेही क्लेश होत नाही. त्याची शी, सू काढताना तिला किळस वाटत नाही. ती त्याला चालायला, बोलायला, चांगले वागायला शिकविते. ती त्याचा पहिला गुरू असते. त्याचे चिमखडे बोल ऐकून तिचे कान तृप्त होतात. त्याला न्हाऊ-माखू घालताना, खाऊ घालताना तिला परमोच्च संतोष लाभतो. गरीब, दरिद्री आईही भाकरतुकडा प्रथम लेकराला खाऊ घालते. त्याला शिक्षण देण्यासाठी धडपडते. तो मोठा साहेब व्हावा, अशी स्वप्न पाहते. बालकाला व्यंग वा आजार असला तरीही ती आपली माया पातळ होऊ देत नाही. आजारी लेकरासाठी ती रात्ररात्र जागते. त्याची सेवा करते. अश्याच एका संकटात सापडलेल्या मुलाला स्वताची किडनी देत आईने आपल्या मुलाला पुर्णरजन्म दिल्याची घटना कुऱ्हाड गावात घडली आहे.
कुऱ्हाड येथील भगवान नारायण हिरे वय ४७ यांची काहि वर्षांपूर्वी एक किडणी खराब झाली होती याकरिता भरपूर औषधोपचार केले मात्र यश येत नव्हते याच दरम्यान दुसऱ्या किडणीवर परिणाम होऊन तीसुद्धा निकामी झाली उपचारासाठी नारायण हिरे मुंबई, पुणे सर्वदूर दवाखान्यात फिरुन उपचार घेत होते मात्र काहीच फायदा होत नव्हता सरतेशेवटी मुंबईच्या डॉक्टरांनी किडणी बदलण्यासाठी सल्ला दिला हे ऐकताच हिरे परिवाराच्या पायाखालची वाळू सरकली
भगवान व त्यांच्या आई कमलबाई नारायण हिरे यांंची परिस्थिती जेमतेम असून आधीच जवळपास पाच लाख रुपये खर्च झाला होता व आता किडनी मिळून ती बसवणं हिरे कुटुंबीयाच्या आवाक्याबाहेर होते याच विवंचनेत असतांनाच भगवान हिरे यांच्या वृध्द आईने स्वताची किडनी देण्यासाठी निर्णय घेतला परंतु आई वृध्द असल्याने आईची किडनी घेतल्यानंतर आईचं काय होईल ही भिती होती तरीही आईने हट्ट कायम ठेवला व आईच्या हट्टापुढे भगवान व सर्व नातेवाईकांनी मार मानली व आईची किडनी मुलाला देण्याची तयारी सुरु झाली त्यांनी लगेचच औरंगाबाद येथे दवाखान्यात जाऊन सगळ्या तपासण्या पुर्ण केल्यानंतर किडनी मॅच झाल्यावर ऑपरेशन करुन आईची किडनी मुलाला देण्यात आली ऑपरेशन यशस्वी होऊन आज भगवान हिरे व त्यांच्या आई कमलबाई ठणठणीत सुखरूप आहेत ही घटना पाहता
आईची ममता किती अगाध आहे, हे अनेक कथा-लोककथांमधून सांगितले गेले आहे आपण त्या वाचतो ऐकतो परंतु वास्तवात ही सत्यता आज कुऱ्हाड गावातील एका आईने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वताची किडनी देऊन मुलाला पुनर्जन्म दिला आहे.
नक्कीच आपण ही बातमी पुर्ण बघाच.