वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२१
दिनांक १० एप्रिल शनिवार रोजी वरखेडी परिसरातील विद्यूतपुरवठा रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक खंडीत झाला होता. या बाबत वरखेडी परिसरात एकच गोंधळ उडाला होता.याची दखल घेत वरखेडी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता वरखेडी ते डांभुर्णी रस्त्यावर एक ॲग्रो कंपनी असून विद्यूतवितरण कंपनीची कोणतीही रितसर परवानगी न घेता या कंपनीत काम करणाऱ्या एक परप्रांतीय व्यक्तीने स्वता व एका स्थानिक तरुणाच्या मदतीने विद्यूतपुरवठा खंडीत केल्याची बाब लक्षात आली होती.
हा प्रकार घडत असतांनाच एका सजग नागरिकाने क्षणाचाही विलंब न करता मोबाईमध्ये विद्यूत पुरवठा खंडित करणारांचे छायाचित्र काढून घेतले होते. व ते छायाचित्र सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाले होते. म्हणून जनतेतून सभ्रम निर्माण झाला होता. म्हणून सत्यजित न्यूजने वरखेडी परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ? या मथाळ्याखाली बातमी प्रकाशित करुन जनतेच्या म्हणण्यानुसार चौकशीची मागणी केली होती. तसेच वरखेडी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी या घटनेची दखल घेत श्री गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन ला दिनांक ११ एप्रिल रविवारी तातडीने रितसर लेखी स्वरूपात नोटीस देऊन अनाधिकृतपणे विद्यूतपुरवठा खंडित केल्याबद्दल जाब विचारला होता.
परंतु संबधीत कंपनीच्या संचालकांनी (मालकांनी) नोटीस दिल्यापासून दिनांक २७ एप्रिल २०२१ मंगळवार पर्यंत नोटीसला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने संबंधित श्री गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कंपनी विषयी नाराजी व्यक्त करण्यात येत असून जनमानसातून संशय बळावला आहे.
कारण एका ॲग्रो कंपनीचा कर्मचारी एका स्थानिक तरुणाच्या मदतीने ऐन संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास गावपरिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करतो. ही बाब संशय घेण्यासारखी असून वरखेडी ग्रामस्थांच्या मनात अनेक शंका, कुशंका निर्माण झाल्या असून याबाबतीत लवकर तपास करुन सत्य बाहेर आले पाहिजे अशी मागणी वरखेडी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच या ॲग्रो कंपनीतुन बऱ्याचवेळा माल वाहतूक करतांना मोठमोठ्या अवजड कंटेनरचा वापर केला जोतो हे कंटेनर रात्री बे रात्री भरवस्तीतुन नेले जात असल्याने डांभुर्णी रस्त्यावरील श्री गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन पासून ते वरखेडी बाजारपेठ तसेच बसस्थानक परिसरातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे हे मोठमोठे कंटेनर अवजड असून याच्या रहदारीमुळे चांगला रस्ता खराब झाला. असून गुरुदत्त मेडीकल जवळील नाल्यावरील मोरीवजा पुलाला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे या कंटेनरची उंची जास्त असल्यामुळे वरखेडीचे बाजारपेठेत व बसस्थानक परिसरातील रहिवास्यांच्या घरात घेण्यात आलेल्या विद्यूतपुरवठ्याच्या सर्व्हिस वायर वारंवार तुटून पडतात व ग्रामस्थांना नहाकच अंधारात रहावे लागते व विद्यूतपुरवठा सुरळीत करण्यासाठी पदरमोड करावी लागते विशेष म्हणजे मागे एका कंटेनरची धडक लागून रस्त्याच्या बाजूला असलेले निंबाचे झाड एका भोई बांधवांच्या टपरीवर पडले होते परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु त्याचे उदरनिर्वाह करण्याचे दुकान चक्काचूर झाले होते..
या येणाऱ्या समस्यांबाबत संबंधित मालकांना वारंवार सुचना देऊनही काहीच फायदा होत नसल्याने व ग्रामपंचायतीने रितसर दिलेल्या नोटीसला उत्तर न मिळाल्याने सुज्ञनागरीकांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे
याबाबतीत जनतेतून जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार याच परिसरात एका ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील तसेच परराज्यातील रेशनिंगच्या तांदळाचा अवैध साठा केला जातो. व भरपूर मालाचा साठा जमल्यावर हा रेशनिंगचा माल एकाचवेळी तिन ते चार मोठे कंटेनर भरुन पसारा केला जातो. परंतु हा माल चोरट्या पध्दतीने या परिसरातून वाहून नेतांना कुणालाही समजायला नको म्हणून विद्यूतपुरवठा खंडित करुन माल पसार करणे सोपे जाते. त्याकरिता विद्यूतपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केला आहे.
कारण मागील आठवड्यात गोरगरिबांसाठी मिळणारा रेशनिंगचा तांदूळ परदेशात नेला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने या ठिकाणी असलेले धान्य कोणते, कुठून खरेदी होते, या ठिकाणी साठवण्यात आलेल्या धान्याची पोती किती यात तांदूळ व इतर धान्य किती या धान्याच्या खरेदी विक्रीची तपशीलवार नोंद आहे का ? असे बरेचसे प्रश्न जनतेतून उपस्थित केले जात असून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जनमानसातून केली जात आहे.