रा. स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे गजानन क्षीरसागर यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या तर्फे दिला जानारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार यावर्षी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल कुलकर्णी हे होते,प्रमुख मान्यवर तुषार जुवेकर,(संयोजक स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार), रमेशराव जोशी,अनिल कुलकर्णी, मनीष काबरा हे होते.प्रमुख उपस्थिती यामध्ये शरद भाऊ खाडिलकर,(जनकल्याण समिती प्रांत संघटन मंत्री) राजू कुलकर्णी (विभाग कार्यवाहक) निलेश खांडवेकर,उत्तमराव थोरात, अतुल जहागिरदार,पराग महाशब्दे,नंदू शुक्ल,सुमितजी पंडित,देविदास पंडित,सिद्धार्थ सोनवणे,मिराबाई पंडित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाघ यांनी केले.व्यक्तिगत गीत उमेश जाधव यांनी सादर केले, आभार प्रदर्शन किरण कुलकर्णी यांनी केले,पसायदान गुणवंत क्षीरसागर यांनी गायले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर कोळी, चित्रीकरण अमोल गोंधळी,मंडप व्यवस्था राजू कोळी,संतोष कोळी,हेमंत गुरव,महिंद्रा घोंगडे, वैभव गिते राहुल माळी दिनेश पांडव मयूर मासाळ,वैभव देविदास गीते, विनायक शिरसागर ,सतीश चौधरी,राहुल चौथे, देवेंद्र माळी ,देवेंद्र कोळी,शशिकांत गीते,गोपाल वाणी,योगेश वाणी,सिताराम वाणी,सचिन कुंभार,अमोल काळे,समाधान कोळी,रुपाली क्षीरसागर, वर्षा वाणी मीराबाई वाणी ,माणुसकी ग्रुप सदस्य,बजरंग दल सदस्य, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.
युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार जीवनात आणावे… रमेशराव जोशी
स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करून समाजाचा व स्वतःचा विकास करावा.आपल्यात सेवाभाव उभा राहावा यासाठी प्रयत्न करणे. आपल्या धर्मातील कोणती व्यक्ती पीडित राहू नये त्यांचे दुःख दूर करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,आजचे उत्सव मूर्ती गजानन क्षीरसागर त्यांच्यासारखे तरुण निर्माण व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे रमेश राव जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले.