पाचोरा तालुक्यात रेशन माफियांचा धिंगाणा, सौ चुहे खाके बिल्ली ** को रवाना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील रेशनिंग घोटाळा दिवसेंदिवस वाढतच असून या घोटाळ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई किंवा चौकशी होत नसल्याने, स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित असलेल्या गावागावातील सर्वसामान्य जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून या स्वस्त धान्य वाटपाचे घोटाळ्याच्या वाहत्या गंगेत पुरवठा विभाग, संबंधित अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार हे सगळेच हात धुवून घेत असल्याने जनतेच्या तक्रारींकडे संबंधीत अधिकारी दुर्लक्ष आरोप केला जात आहे.
[एका बाजूला गोरगरिबांच्या तोंडाचा हक्काचा घास हिरावून घेत लाखो रुपये कमाई करायची व दुसरीकडे या केलेल्या पापावर पांघरून घालण्यासाठी ठिकठिकाणी फक्त हजार, दोन हजार रुपये देणग्या देत होम, हवन व तीर्थयात्रा करुन रावणाचा चेहरा लपवण्यासाठी प्रयत्न केला जातो.]
पाचोरा तालुक्यातील बरेचसे स्वस्त धान्य दुकानदार दरमहा धान्य वाटप करत नसून नियमानुसार दररोज धान्य दुकान उघडले पाहिजे परंतु असे नियम न पाळता सगळीकडे महिन्यातून एक ते दोनच दिवस धान्य वाटप करतात तसेच पॉश मशिनवर अंगठा घेऊन कोणत्याही पावत्या देत नाहीत. तर काहि ठिकाणी कोऱ्या कागदावर सट्ट्याच्या चिठ्ठी प्रमाणे आकडे लिहून चिठ्ठी दिली जाते. रेशनिंग दुकानात कोणताही माहिती किंवा सुचना फलक लावलेला दिसून येते नसून धान्य वाटपाचे सरासरी प्रमाण किती व इतर माहिती दिली जात नाही. अश्या बऱ्याचशा तक्रारी समोर येत असल्याकारणाने चौकशी करण्याची मागणी होत होती.
या तक्रारींची व स्वस्त धान्य दुकानातून होणाऱ्या महा घोटाळ्याची दखल घेत कॉंग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी आज सत्यजित न्यूजकडे याबाबत सविस्तर माहिती देत पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी गोरगरिबांना धान्य मिळणे सोयीचे करुन द्यावे अशी मागणी केली आहे.
(या आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी मा.श्री. पुरी यांच्या कार्यालयात गेलो असता संबंधित अधिकारी देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी येथे गेले असल्याने जनतेने केलेले आरोप व वस्तूस्थिती यातील सत्यता काय आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.)
परंतु पुरवठा कार्यालयाकडून आलेल्या तक्रारींकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा चौकशी सुरु आहे असे सांगितले जाते किंवा तक्रारदारांवर दबाव आणून तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडले जाते असेही काही तक्रारदारांनी सांगितले. विशेष म्हणजे तक्रारदारांची मनधरणी करण्यासाठी काही प्रतिष्ठित नागरिक व काही लोकप्रतिनिधींही मध्यस्थी करत असल्याने तक्रारदारांना गुमान चुप बसावे लागते असेही काही तक्रारदार सांगतात.
क्रमशः~अधिकारी आमच्या खिशात मग काय कुणाची बिशाद