‘ते’ राणेंच करू शकतात
‘तिसरा डोळा’
सिंधुदुर्गनगरी
केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्राचे महसुल मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग संपन्नता, जैवविविधता आणि विविध सण, उत्सवाच्या माध्यमातून असलेली परंपरा, संस्कृती ही जगासमोर जावी आणि त्यातून आर्थिक विकास या भागाचा व्हावा म्हणून पर्यटन जिल्हा जाहीर केला. विविध योजना त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला अनेक उपक्रम त्यांनी पर्यटन वृद्धीसाठी केले. पर्यटना बरोबरच समुद्रकिनारी आणि महत्त्वाची ठिकाणे, गाव हे स्वच्छ असले पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र या जिल्ह्याचे दुर्दैव असे की सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि विकास प्रक्रियेला खिळ पडायला सुरुवात झाली. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिमंडळात असलेले वजन हे कोणीच अमान्य करू शकत नाही. त्यांचा पराभव झाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला निधी येणे बंद झाले. जो निधी येत होता तो मर्यादित आणि आमदारांच्या, खासदारांच्या कक्षेतील होता. जो निधी मंत्रिमंडळात भांडून आणणें अपेक्षित होते असा निधी सिंधुदुर्गात गेल्या ९ वर्षांमध्ये आला नाही हे सुद्धा सत्य नाकारू शकत नाही.
आता पुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्य प्रवाहात आले आहेत. आणि त्यांची प्रशासनावर असलेली पकड त्यांनी दाखवून दिली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत त्यांनी खंत व्यक्त केली की, माझा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मात्र सिंधुदुर्ग नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर अस्वच्छतेचा नजारा बघावा लागतो. कार्यालया बाहेर झालेली अस्वच्छता ही डोळ्यात खुपते जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक कार्यालयांमध्ये स्वच्छता करून परिसर टापटीप करा असे आदेश त्यांनी दिले हे आदेश मिळाल्यावर प्रशासन कामाला लागले सध्या सिंधुदुर्ग मुख्यालयामध्ये गेल्यावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अनेक भागातील परिसर स्वच्छ आणि रंगरंगोटी केलेले दिसतात गेल्या ९ वर्षांमध्ये ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी याकडे कधीच लक्ष दिला नाही असेच दिसून येते. एखाद्या व्यक्तीमध्ये वेगळेपण असतं त्याला व्हिजन असतं हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. प्रशासनावर कशी पकड असली पाहिजे तर प्रशासन नमते हे त्यांनी दाखवून दिले आहे. अधिकारी, कर्मचारी हे येणार बदली होऊन जाणार पण माझ्या जिल्ह्याची जी ओळख आहे ती कायम टिकली पाहिजे असा संदेश देणारे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आदेश आहेत हे राजकीय पुढार्यांना मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना दिशा देणारे आहे एवढे नक्की.
सुसाट न्यूज टिम