डॉ. सुवर्णा पाटील यांचा अमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार.
अनिल आबा येवले.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२४
अमळनेर येथे नुकतेच ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात भडगाव येथील डॉ. सुवर्णा पाटील यांनी अभिनव कथा प्रकाशन साहित्य संपदा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच या पुस्तकात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल त्यांचा जेष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
डॉ. सुवर्णा पाटील ह्या एक चांगल्या डॉक्टर असून त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने व्यवसाय करतांना त्या खेडोपाडी शिबिर घेऊन गोरगरिबांना अल्पदरात व मोफत औषधोपचार उपलब्ध करुन देतात. तसेच डी. एम. एल. टी. शिक्षण संस्था चांगल्याप्रकारे सांभाळून त्यांना वाचन व लिखाणाची आवड असल्याने त्यांनी आजपर्यंत समाजप्रबोधन व जनजागृती करण्यासाठी अनेक लेख व पुस्तके लिहिली असून आता नुकतेच त्यांनी लिहिलेल्या अभिनव कथा हे पुस्तक साहित्यसंपदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात त्यांनी तरुण पिढी ही मोबाईलवर ऑनलाईन गेम्सच्या कशी आहारी गेली आहे यावर मुद्देसूद लिखाण केले आहे. तसेच मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळे, शरीर व बुध्दीमत्तेवर होणारे दुष्परिणाम सांगितले असून ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगत काहींनी यात आपला जीव गमावला असल्याचे पुराव्यानिशी सत्य परिस्थिती पटवून देत अशी एक नाही तर अनेक उदाहरणे या पुस्तकात कथन केली आहेत.
या पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळ्याचे प्रसंगी अहिराणी लेखक श्रीकृष्ण पाटील, शिव व्याख्याते श्री. सदाशिव सूर्यवंशी सर, गजल कार श्री. कुणाल पवार सर, कवी श्री. बी. एम. चौधरीसर, श्री. नामदेव कोळी सर, श्री. नारायण दीपचंद पाटील, सौ. चित्रा नारायण पवार, श्री. जगदीश नारायण पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते.