स्वातंत्र्य देवी भारत माता,कवी~अरुणाग्रज (शिंदाडकर)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०८/२०२२
कवी म्हणून प्रसिद्धी मिळावी असा हेतू यात मुळीच नाही. काव्य निर्मिती कौशल्याचा योग्य वापर व्हावा या भावनेतून कविता निर्माण झाली. या कवितेत येणाऱ्या पिढीला आपल्या देशाची पुर्वस्थिती ‘आजची शासन व्यवस्था’ आपले हक्क तसेच कर्तव्य यांची जाण होऊन आपला भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. येणाऱ्या काळात आपण ऐकोप्याने वागून, स्वातंत्र्य आबादित ठेवू ही आशा येथे माझ कवी मन करीत आहे.
*स्वातंत्र्य देवी भारत माता*
– अरुणाग्रज.
स्वातंत्र्य देवी भारत माता
वंदन हिला करू चला
पंच्याहत्तरीच्या उमऱ्यावरती
हुतात्म्यांना स्मरु चला..
हिच्याच खातीर येथे पडले
सडे बहादूर रक्तांचे
आहुतीचा यज्ञ पेटला
शिरे वाहिली भक्तांचे.
हिच्याच साठी अगणित गेले
हसता हसता फाशीवर
शतका नंतर पहाट उगवली
काळोखातुन वेशीवर…
अनामिकांच्या बलीदानातुन
भारतमाता प्रसवली
टाकीचे ते घाव सोसुनी
स्वातंत्र्य देवी अवतरली.
स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधूता
चार स्तंभावर ऊभी दिसे
शासन पद्धत अंगीकारली
लोकशाहीची छबी असे.
संविधानाच्या पानांमधूनी
श्वास मोकळा घेत असे
कायद्याच्या चाकोरीतुन
वाट मोकळी जात असे..
हिच्या अंगणी फुले उमलली
विविध जाती धर्मांची
त्या फुलांतुन सूरभि वहाते
एकतेच्या वर्माची..
हिचे जाणुनी रुप साजरे
धर्म आपुला जागावा
सहिष्णुतेची जान ठेऊनी
हक्क आपुला मागावा.
हिला छळाया टपले कौरव
तसेच राक्षस रावण ही
तपोबलाने ऋषी मुनींच्या
अखंड ठेऊ पावन ही
मुलभूताचा घास हक्काचा
गोर गरीबा छळू नका
दोन वेळेची गरज आपुली
पिंड फुकाचे गिळू नका.
जनहिताचे खरे दागिने
सत्य,अहिंसा,दया,धरम
षडरिपूंना सारुन दुरी
अंगी बाळगू निती धरम.
हिचे कराया रक्षण आपण
चला हिमालय होऊ या
नद्या नद्यांच्या प्रवाहामधूनी
सागर गीते गाऊ या
नव्यायुगाचे नवीन वारे
तंत्र स्विकारू नवे नवे.
प्रकाश पेरु दाही दिशात
दिव्या वरती लाऊ दिवे
एकवेळ तव घात झाला
सावध राहु याच्या पुढे
दुधाचे ते चटके आठवून
ताक ही फुंकून घेऊ पुढे.
सातखंडात ऊभा वाजवू
संस्कृतीचा डंका मोठा
सृजनत्वाची मशाल घेऊन
अभिव्यक्तीला दाऊ वाटा.
पंच्याहत्तरीची जाण ठेऊनी
कोटी कोटी नमन हिला
चंद्र-सुर्य नभी जोवरी
हिचे अस्तित्व राखू चला..
कवी-
अरुणाग्रज (शिंदाडकर)
9527161626