लहानपण खरच सुंदर होते हो, (हरी महाजन)मेणगाव.
दिनांक~११/०१/२०२२
लहानपण खरच सुंदर होते हो,,
एक रुपयात सुद्धा आनंदी होतो..!
आता लाखो आहेत, पण आनंद नाही,
एका गोळीचे चार तुकडे करून वाटून खाणारे आपण..!
कधी या काळाच्या ओघात अन मायेच्या बाजारात मतलबी झालो ते कळलेच नाही..!
नदीचे तुंबलेले पाणी पिऊन सुखी होतो, आता मिनरल वॉटर पिऊन आजारी आहोत,
मातीच्या घरात सुद्धा शांत झोप लागायची,
आता झोपे साठी तरसतो आहोत,
एकच ड्रेस असायचा, तो ही चुरगुळ्या पडलेला,
पण त्यातही बॅरिष्टर असल्याची भावना मनाला आनंदी ठेवून जायची,
आता कपड्यांचा बाजार घरात आहे पण घालायला वेळ नाही,
😔😔😔
दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात आवर्जून जाणे ही जणू पद्धतच होती, चार चार दिवस मुक्कामी राहून सुद्धा वेळ च वेळ होती,
आता घरच्या लग्नात सुद्धा वेळ मिळत नाही,
कुठे गेली असेल ही वेळ.???
की माणसाचे आयुष्य कमी झाले त्या मुळे ही वेळ पळून गेली असावी का कुठे.??
दूर डोंगरात कुठेतरी पाण्याचा झरा असायचा, दोन दोन किलोमीटर वरून आपल्या आई बाबांनी पाणी आणले आणून
अंगणात खाट टाकून आपली अंघोळ केली आहे,, किती कष्ट होते या सगळ्यात,
पण तरी ते दिवस सुखी होते,
आज सरळ अंगावर शॉवर लागते, थंड गरम पाणी नुसता नळ फिरवला की अंगावर पडते, तरी अंघोळ करण्यातला आनंद हरवलाय..
स्वयंपाक घराचे कधी किचन झाले ते कळलेच नाही,
अत्याधुनिक किचन..! ☺️☺️☺️☺️
इकडून पीठ मळलं की तिकडे चपाती तयार,
चूल नाही, लाकडे नाही, एक बटन फिरवले की अग्नी तयार,
अगदी २० मिनिटात जरी जेवण बनवायचे म्हटले तरी रेडी..!!☺️☺️☺️👌👌
पण खाण्यातला आनंद हरवलाय..
काय झालंय काय माहीत,
जगणे फक्त एक टाईमपास म्हणून राहून गेले,
अन अवघे आयुष्य पैसे कमवण्यात निघून गेले,
आपलाच कवी..नारायणसुत,
हरी महाजन