हयातीतच वारस लागले उताऱ्यावर, आजीबाईंना सोडल उकिरड्यावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२३
“जे नाही ललाटी, ते देतो तलाठी” तसेच तलाठी हा या भुतलावरचा ब्रम्हदेव आहे असेही म्हणतात. कारण संपूर्ण महसूल विभागाचा लेखाजोखा यांच्या लेखणीतून लिहिला जातो. याचाच गैरफायदा घेत पैसे कमावण्यासाठी महसूल विभागात मागील एक दशकापासून मोठ्या प्रमाणात भ्रषष्टाचार सुरु झाला आहे. यामुळे शेतशिवारातील विहीर चोरीला जाणे, बांधारा सरकारने किंवा चोरीला जाणे, रातोरात वहिवाटी रस्ते नकाशावरून व शेतातून गायफ होणे. परस्पर कुळ लावणे, शेतात विहीर नसतांना उताऱ्यावर विहीर असल्याची नोंद करणे, उताऱ्यावर परस्पर पिक पेरा लावणे, लागलेला पिक पेरा उडवणे, संमती नसतांना वारस लावणे, संमती न घेता वारस कमी करणे असे बरेचसे काळे गोरे धंदे केले जात असल्याने भाऊबंदकीत वाद लागत असल्याने या वादात मारामाऱ्या, ठोकाठोक्या तर काही ठिकाणी खुन झाले आहेत. तसेच आपसातील भांडणे मिटवण्यासाठी न्यायालयात जाऊन, जाऊन पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे महसूल विभागातील तलाठी कार्यालयापासून तर तहसील, प्रांत व जिल्हा कार्यालयातील भ्रष्टाचार.
अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे घडली असून एका सत्तर वर्षे वयाच्या आजीबाईंच्या शेतीच्या उताऱ्यावर जिवंतपणी वारसांची नोंद करुन घेत आजीबाईंच्या मुलांनी व सुना, नातवंडानी आजीबाईंना वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे या आजीबाईंवर उपासमारीची पाळी आल्यामुळे म्हातारपणी योग्य आहार व रहाण्यासाठी घर नसल्याने उकिरड्यावर पडून राहण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील सर्वसाधारण कुटुंबातील सत्तर वर्षे वयाच्या श्रीमती केशरबाई वना मराठे या पिढ्यानपिढ्या वडगाव आंबे गावात रहातात या आजीबाईंना तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार या तीन मुलांपैकी एक मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह सुरत येथे मोलमजुरी करुन आपल कुटुंब सांभाळत आहे. तर दोन मुले मयत झाली असून एक सून माहेरी रहाते तर सगळ्यात लहान सून वडगाव आंबे गावातच रहाते. या श्रीमती केशरबाई वना मराठे यांच्या नावे वडगाव आंबे शिवारात गट क्रमांक व उपविभाग ७३ ही एक हेक्टर ९७ आर शेतजमीन आहे.
मुल व सुना आजीबाईंना वागवत नव्हत्या म्हणून या आजीबाईंची शेत जमीन जो कुणी असेल त्याने आजीबाईंना दोन वेळचे जेवण, कपडेलत्ते व वैद्यकीय खर्च करावा असे ठरले होते. या बोलीवबंधनाप्रमाणे गावातच राहणारी आजीबाईंची लहान सून हिने शेती ताब्यात घेऊन आजीबाईंना दोन वेळची भाकरी कपडे लत्ते व वैद्यकीय खर्च करण्याचे ठरले होते या ठरावानुसार संबंधित सुनबाईने मागील सात, आठ वर्षापासून आजीबाईंना खाऊ पिऊ घातले परंतु दिनांक ३० हे २०२२ पासून आजीबाईंना जेवणाचा डबा व इतर सोयी सुविधा देणे बंद केले आहे.
तेव्हापासून आजीबाई गावातील घराशेजारी तसेच गल्लीत राहणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून जेवण मागून आपले जीवन जगत होती. असे दिवस काढत असतांनाच आजीबाईंना कधी वेळेवर तर कधी यावेळी जेवण मिळत असल्याने व वृद्धपकाळाने जास्त थकवा जाणव लागला व आजीबाईची प्रकृती खालावली आजीबाई उकीरडल्यावर पडल्या होत्या म्हणून गाव लोकांनी गावातील तिच्या सुनेला व नातवाला फोन केला व आजीबाईंची परिस्थिती कळवली तेव्हा त्यांच्याकडून आजी मेल्यावर आम्ही येऊ तुम्ही चिंता करू नका असे उत्तर मिळाले हे ऐकुन गावकरी संतप्त झाले होते.
नंतर माणुसकी समूह लोहारा व दिलीप जैन यांनी आजीबाईंना तातडीने जळगाव येथील दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. त्यानंतर आजीबाईंच्या नावावरील शेताचा उतारा काढल्यावर असे आढळून आले की आजीबाईंच्या एक मुलाने व दोन सुनांनी मिळून महसूल विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याला हाताशी धरून आजीबाईंच्या नावावर असलेल्या शेतीला वारस लावून घेतले व आता ही शेती आमच्या बाप्पाची झाली असे समजून त्यांनी आजीबाईला जेवणापासून इतर सुविधा देणे बंद केल्याचे लक्षात आले आहे.
हा गैरप्रकार आजीबाईंना माहित पडतात आजीबाई सतत संताप करत असून मला अजून जगायचे आहे. मला माझी शेती माझ्या नावावर करून पाहिजे यासाठी टाहो फोडत आहेत. परंतु आजीबाईच्या वृध्दपकाळात हातात एक रुपया नसल्याने अर्जफाटे करुन परत शेती मिळवणे आजीबाईंच्या आत्यारीत नसल्याने आजीबाई आता आपली तक्रार घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गावकऱ्यांची मागणी ~
केशरबाई वना मराठे या आजीबाईंच्या नावावर असलेल्या शेतजमीनवर आजीबाई हयात असतांना व आजीबाईंची संमती नसतांना ज्या महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी हे हेराफेरी करण्याचे काम केले आहे. याची चौकशी होऊन संबंधित जो कुणी असेल त्याला दोशी धरुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी व आजीबाईंच्या शेतजमिनीच्या उताऱ्यावर लागलेली वारसांची नोंद रद्दबातल ठरवी अशी मागणी केली जात आहे.