“अयोध्या” अरुणाग्रज (शिंदाडकर)
दिनांक~१९/०१/२०२४
*अयोध्या…..*
ऊठा…! ऊठा…! उठले सारे.
हिमालयाची कडेकपारे.
सातही सागरी ऊठल्या लाटा
दाही दिशांना फुटल्या वाटा.
उठली राने उठले डोंगर
उठली अवनी हलवून अंबर.
वृक्ष वेली आणि उठले तारे
चंद्र चांदण्या सुसाट वारे.
चिडी मुंगी अन् पशुपक्षांची
किलबिल झाली चोहीकडे.
शुष्कालाही फुटले अंकुर
पाझरू लागले पाषाणकडे.
पापणीच्या क्षितिजा मधे
हजारो सूर्य उगवून बुडले.
रामनामच्या जपमाळेला
कित्येक राक्षस होते नडले.
वाल्मिकीची वारुळातुन
‘रामनाम’ धुन ऐकू आली.
शतकोत्तर उषःकाल ही
पूर्व दिशेला उजळून आली.
आले आले श्रीराम आले
रोम रोम हर्षोल्हासित झाले.
कपाळी मरवट भरते अयोध्या
रातकाळी सारुन आले.
देवादिक अन् ऋषीमुनींचा
कोंदला श्वास झाला मुक्त.
‘राम आले राम आले..!’
एकच घोष आहे फक्त.
घातपाताचे बळी ठरुनी
पुरुषोत्तम कैदेत होते.
आत्मपरीक्षण करुन बोला
कोण दोषी अन् पापी होते?
शकुनीच्या छलकपटाचे
पांडव दूत हारुन बसले.
रावणाच्या विकृतीने
तेहतीस कोटी कैदेत दिसले.
इतिहासाची पाने सांगती
राजा शंभूची कथा येथे.
धृवबाळही नाडला होता
आप्तस्वकियाने जेथे.
सांगा…सांगा..मग आता सांगा?
कोण कारण याला होता?
शिलाहाराची तिन घरानी?
मोगल,निजाम,का सुलतानी..?
कोण..कोण..अजून कोण..?
का म्हणून धरलं मौन..?
बोला.. बोला.. आता बोला..?
‘राम कसम सत्य बोला…!’
भारत भूचा कवी आहे मी
निधडी आहे माझी छाती.
लेखनीची तलवार वापरतो
धर्मग्रंथ माझ्या हाती…..!
हिंदपुत्र तेव्हा का बापुडे
एवढे बसले होते थंड?
बांगड्या भरुन घ्यायला
ते का होते भित्रे षंढ?
मराठ्यांनी राखली दिल्ली.
अयोध्या काय अवघड होती?
एक मात्र नक्की साऱ्या
हिंदुस्थानात पडझड होती.
ज्याच खेटर त्याच्या पाया
नव्हतं, मात्र एवढं खर.
खुदालाही मान्य नव्हतं
रामाच लुटलेले घर.
कोण बाबर कोठूण आला?
मनमानीने धिटाई केली.
रामलल्लाची मिटवून खूण
बाबरी मजिद ऊभी केली.
शेकडो नाही हजारो नाही
लाखो भक्तगण शहीद झाले.
त्या रक्तांनी बनवून विटा
रामलल्लास बाहेर केले.
यातून धडा शिकावा लागेल
राम प्रत्येकाला व्हाव लागेल.
राहाव लागेल मर्यादेत….!
अंहकार त्यागावा लागेल.
व्हाव लागेल विश्वामित्र
देव धर्म आणि देशासाठी.
ती त्राटीका वधावी लागेल
यज्ञपुर्तिच्या सोहळ्या साठी.
गौतमीही तुम्हीच व्हाव
कल्पवृक्षाच्या छायेसाठी.
कामधेनू ही पाळावी लागेल.
भूकेलेल्या पोटा साठी.
जगाव लागेल तुम्हाला
राम होऊन वागाव लागेल.
शापित अहिल्या देवी तिचा
उध्दार कराया जगाव लागेल.
परशुरामाचा शिव धनुष्य
चार चौघात पेलावा लागेल.
जनक कन्या ती सिता मैय्या
तिच्या रक्षणा झिजाव लागेल.
आई कैकयीच्या शब्दा खातर
वनवासाची तयारी ठेऊ
भरत शत्रुघ्नास देऊन गादी
बंधूभाव हा जागा ठेऊ.
ती पतिव्रता जानकी माता
तिचा आदर्श घ्यावा लागेल.
बंधूप्रेमा खातर वनात
लक्ष्मण होऊन जावं लागेल.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
काय होती रामकथा
थोडा सार सांगतो आता.
देवासूरांचे युध्द छळले
राजा दशरथ बेधुंद लढले.
रथाचे तव चाक निखळता
कैकयीने सहज पकडले.
या धैर्याची जाण ठेऊनी
राजा दशरथ हर्षित होऊनी.
दोन वर कैकयीस देऊनी
संतुष्ट मग तिजला केले.
कैकयी कौश्यल्या सुमित्रा माता
आसूर विजेता दशरथ पिता.
राज्याभिषेक रामाचा थाटला
अयोध्या नगरीत आनंद दाटला.
तेथे होती मंथरा दासी.
डाव खेळली कैकयी पाशी.
दोन वरांची दिधली आठवण
येथेच शिंकली होती माशी.
तेव्हा मग ती कैकयी राणी
वर मांगते दशरथा पाशी.
‘एक राजगादी ती भरताला…!’
‘दुजा राम करी वनवासी…!’
सुर्यवंशी तो राजा दशरथ
वचनावर अबाधित होता.
पूत्र शोकाने विव्हळला तो
श्रावणाचा शापीत होता.
अयोध्येचा घेऊन निरोप
शरयू ओलांडून प्रभू गेले.
ते राम खरे ज्यांनी
पितृ वचन निभवून नेले.
राम लक्ष्मण सिता मैय्या
राज वैभव त्यागून शैय्या.
माता पित्याचा असा सौदा
वनवन भटकले वर्ष चौदा.
त्यांचा आदर्श घ्यावा लागेल
राम बनून रहाव लागेल.
शबरीच्या भोळ्या भक्ती साठी
खावे लागतील बोरे ऊष्ठी.
पतितपावन तेव्हा कळेल.
जेव्हा षढ़रिपू मातीत मिळेल.
अपहरण केली सिता ज्याने
तो रावण ठेचून काढू.
तो मारीच मायावी हरण
चामडी त्याची ओढून काढू.
जटायूचा तो लढावू बाणा
स्वामी खातर त्यागू प्राणा.
तेथे ढळतील अश्रू दोन
तेव्हा कळेल राम कोण….!
महारुद्र हनुमान बजरंगी
ब्रम्हचर्य बाळगून अंगी…!
सुर्यालाही गिळू प्रसंगी.
समुद्र लांघून सितेसाठी
रामभेट देऊ अंगठी.
उचलून आणू पर्वत हाती.
राम दाखवू ऱ्हुदयात निडर
फाडून निधडी आपुली छाती.
वाली-सुग्रीव मिटवून वाद
अंगदाला घालून साद.
शिष्ठ बनू तसे धारिष्ट्य
रावणास ही सांगू स्पष्ट.
जमवून वानर सेना सारी
लंकापुरी वर करुनी स्वारी
मेघदूताचा छाटून हात
नेऊन फेकू सुलोचना द्वारी.
मारावा लागेल कुंभकर्ण
जो रावण बधू राक्षस होता.
तारावा लागेल तो बिभीषण
तो रामभक्त निस्सीम होता.
हा….अजून एक…..!
अशोक वनामधे त्रिजटाती
सिता मातेची सेवक होती.
राक्षिसिन होती ती, पण……!
सितामातेला वश होती.
तशीच राणी मंदोधरी
धर्मपत्नी रावणाची होती.
‘राम तुम्ही समजून घ्या..!’
रावणाला विनवित होती.
या देवींना कळले राम
आम्हाला ही कळले पाहिजे
रामनामाच्या मार्गावरती
पाऊल आपले वळले पाहिजे.
दशमुख तो लंकेश्वर
वेदशास्त्र पंडित होता.
देवालोकीचे अभय त्याला
अमर तो अखंडित होता.
वधला त्याला त्रेतात ज्याने
तो विष्णूचा अवतार होता.
कुलभूषण तो दशरथ नंदन
राजा प्रभूरामचंद्र होता.
पायदळी तुडविला येथे
शेकडो वर्ष निघून गेली.
ज्या घटीकेची बघतो वाट
ती घटीका जवळ आली.
यदा यदाहि धर्मस्य
द्वापारीचा नारा आहे
त्रेतामधे जन्मूनी राम
कलीयुगी अवतारत आहे.
चला, चला ऊठा, मग जाऊ…!
रामलल्लाचे दर्शन घेऊ.
थांबा……….!
थोडी शिदोरी घेऊद्या
मला ही तुमच्या संगे…….!
*अयोध्या* येऊद्या…..!
*रघूपती राघव राजाराम।*
*पतित पावन सिताराम।।*
कवी-
अरुणाग्रज (शिंदाडकर)
9527161626
📕🖋️🙏🐜🌲🦅