बॅंक ऑफ महाराष्ट्र वरखेडी शाखेच्या व्यवस्थापकाची मनमानी, पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०७/२०२३
वडगाव आंबे येथील २५ वर्षांपासून नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या बॅंक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे नियमितपणे कर्जफेड करुनही नवीन कर्ज मिळवण्यासाठी मागील आठ दिवसांपासून बॅंकेच्या दारात चकरा माराव्या लागत असल्याने बॅंकेच्या व्यवस्थापकाची मनमानी व शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. बॅंक व्यवस्थापकाच्या मनमानीला वैतागून वडगाव आंबे येथील केशव चिंधा पाटील यांनी सत्यजित न्यूज कडे आपली आपबिती सांगितली तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशा अश्रू आले होते.
वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक हे खातेदारांना व्यवस्थीत माहिती व वेळेत कर्ज देत नसून ज्या ग्राहकांकडे कर्ज घेणे आहे अश्या थकित बॅंक खातेदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्याचे खाते बंद करत असल्याने तसेच शासनाकडून मिळालेल्या पिक विम्याची रक्कम परस्पर कर्जापोटी जमा करुन घेत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशी माहिती जनमानसातून चर्चीले जात असल्याने या बॅंक व्यवस्थापकाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्रस्त शेतकरी लवकरच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
{बॅंक ऑफ महाराष्ट्र वरखेडी शाखे बाबत अजून कुणाच्या काही तक्रारी असल्यास ९९७५६६६५२१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा}
(वरील तक्रारीबाबत बॅंक व्यवस्थापक यांच्याकडून खुलासा घेतल्यानंतर खरा प्रकार समोर येईलच.)