पाच महिन्याच्या चिमुकल्यासह विवाहितेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील एका विवाहितेने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेत विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आज ३० हे २०२३ मंगळवार रोजी उघडकीस आल्यानंतर लासगाव गावासह संपूर्ण भडगाव व पाचोरा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृतूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लासगाव येथील रहिवासी आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षातच यांना पुत्ररत्न प्राप्त होऊन याचे नाव असद ठेवण्यात आले होते. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर संसाराचा गाडा आनंदात चालला होता. याच आनंदाच्या भरात बोलता, बोलता असद आता पाच महिन्यांचा झाला होता. याच आनंदाने नांदत असलेल्या संसाराला कुणाची दृष्ट लागली कोण जाणे व आज ३० मे २०२३ मंगळवार रोजी लजिनाबी व पाच महिन्यांचा मुलगा असद यांचे मृतदेह लासगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांनी पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहेरे, दिलीप वाघमोडे व रुग्णवाहिका चालक यांच्यासह रुग्णवाहिका सोबत घेत घटनास्थळी दाखल होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याच्या मदतीने मयत अजिनाबी शेख व असद शेख या बालकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणून पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृतूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेर बिटचे पोलीस कॉन्स्टेबल हे करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता २८ मे २०२३ रविवार रोजी लासगाव येथे समाजातील लग्नसोहळ्यात आरिफ शेख यांच्या परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. म्हणून आरिफ शेख हे सहकुटुंब लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी तयारी करुन आमंत्रित घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी लजिनाबी हिला सोबत चल म्हणून सांगितले मात्र लजिनाबी हिने तुम्ही पुढे निघा मी असदला घेऊन येते असे सांगितले म्हणून अरिफ शेख हे त्यांच्या आई, वडिलांना घेवून लग्नसोहळ्यात सामील होण्यासाठी निघून गेले. मात्र लग्नसोहळा सुरु झाला व अद्यापही लजिनाबी व असद लग्नसोहळ्यात का पोहचले नाहीत म्हणून आरिफ शेख हे अजिनाबी यांना घेण्यासाठी घराकडे आले घरी आल्यावर लजिनाबी व असद घरी नसल्याचे दिसून आल्यावर आरिफ शेख यांनी लजिनाबी व असद या माय, लेकांचा शोध घेणे सुरु केले गाव व परिसरातील घराघरात जाऊन शोध घेतला लजिनाबी व असद कुठेही मिळुन न आल्यामुळे आरिफ शेख यांनी हताश होऊन सरतेशेवटी पाचोरा पोलीस स्टेशनला येऊन लजिनाबी व असद हे माय, लेक हरवल्याची नोंद केली होती. व आज म्हणजे दोन दिवसांनंतर लजिनाबी व असद यांचे मृतदेह लासगाव शिवारातील एका विहिरीत आढळून आले आहेत.
या घटनेबाबत लासगाव गावातून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असून या घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.