सौ. छाया गायकवाड यांच्यासाठी सचिन सोमवंशी व सुनील माळी ठरले देवदूत
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२३
“नाती ही जरी रक्ताने ओळखली जात असली तरी मात्र ती अगोदर मनाने जुळतात व नंतर रक्ताने ओळखली जातात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण एका बाजूला बऱ्याचशा ठिकाणी रक्तांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते तर दुसरीकडे मानाची घट्ट नाती दिसून येतात असाच काहीसा हा प्रसंग”
पाचोरा शहरातच नव्हे तर पाचोरा व भडगाव शहरासह दोघ तालुक्यातील गावागावात सगळ्यांना सुपरिचित असे नाव म्हणजे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन (दादा) सोमवंशी आता तुम्ही म्हणाल की सचिन सोमवंशी हे नाव सुपरिचित कसे व का ? तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे सचिन सोमवंशी ही एक अशी व्यक्ती आहे की जी ऊन, वारा, पाऊस, दिवसरात्र जनतेच्या अडीअडचणीला क्षणाचाही विलंब न करता धाऊन जाणारा माणूस म्हणजे सचिन सोमवंशी म्हणून की काय कुणालाही कधीही अडीअडचण आली म्हणजे अडचणीत सापडलेला व्यक्ती सरळसरळ सचिन सोमवंशी यांच्याकडे धाव घेतो. कारण सचिन सोमवंशी हे समोची व्यक्ती कोण, काय, कोणत्या पक्षाचे किंवा इतर कोणत्याही बाबींचा विचार न करता मदतीसाठी पुढे येतात.
असाच एक प्रसंग काल बघायला मिळाला भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील सौ. छायाबाई गायकवाड या गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिला बाळंतपणासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लक्षात आले लवकरात, लवकर रक्त मिळाले नाही तर बाळाच्या व आईच्या जीवावर बेतू शकते अशी परिस्थिती निर्माण होती आता नेमके काय करावे हेच डॉक्टरांना सुचत नव्हते कारण छायाबाईच्या सोबत कुणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने डॉक्टरांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यातच रात्रीचे दोन वाजले होते व छायाबाईचा रक्तगट ओ निगेटिव्ह व हे रक्त मिळवणे कठीन असल्याने आता काय करावे या चिंतेत असतांनाच डॉक्टरांना एक नाव आठवलं ते सचिन सोमवंशी यांच व क्षणाचाही विलंब न करता वेळेचा विचार न करता रात्री दोन वाजता सचिन सोमवंशी यांना फोन केला रात्र असल्याने सोमवंशी हे फोन घेतात की नाही ही शंका मनात आली परंतु क्षणातच बोला डॉक्टरसाहेब असे शब्द कानावर येताच डॉक्टरांनी सगळी परिस्थिती समजून सांगितली व तातडीने ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्या रक्ताची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.
लगेचच सचिन सोमवंशी यांनी त्यांच्याकडे असलेल्या रक्तदात्यांची नावे पाहून त्यांच्या संपर्कातील ओ निगेटिव्ह रक्तगट असलेले समाजसेवक सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला व परिस्थिती समजून सांगत त्वरित दवाखान्यात यायचे सांगितले सुनील माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच दवाखान्यात येऊन रक्तदान केले व तातडीने त्या महिलेला रक्त चढवून उपचार करण्यात आले.
उपचारादरम्यान छायाबाई यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. आज बाळ, बाळांतीन सुखरुप आहेत ते फक्त आणि फक्त डॉ. वैभव सुर्यवंशी यांनी योग्यवेळी सचिन सोमवंशी यांच्याशी केलेला संपर्क, सचिन सोमवंशी यांच्या एका शब्दात रात्रीच्या वेळी क्षणाचाही विलंब न रक्तदान करण्यासाठी धाऊन आलेले सुनील माळी व सहकार्य करणारे सचिन पाटील, ललित पाटील व शुभम मराठे यांनी केलेली मदत लाखमोलाची ठरली आहे.
म्हणून सौ. छायाबाई यांच्या कुटुंबीयांनी डॉ वैभव सुर्यवंशी यांनी पैशासाठी कोणतीही अडवणूक न करता केलेले उपचार व रक्ताची गरज भासल्यानंतर रक्त मिळवण्यासाठी केलेली धडपड तसेच तसेच सचिन सोमवंशी यांनी प्रयत्न करत मिळवून दिलेले रक्त व रक्तदान करणारे सुनील माळी व मदत करणारे सचिन पाटील, ललित पाटील व शुभम मराठे यांचे आभार मानले या घटनेमुळे रक्तदान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते म्हणून रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते.