भडगाव येथील महावितरण अभियंता यांना मारहाण करून कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२१
(पाचोरा येथे सकल धनगर समाजाची निवेदनाद्वारे मागणी व आंदोलनाचा इशारा.)
पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिनांक ०७ जून सोमवारी पाचोरा व भडगाव तालुक्यात तालाठोक-हल्लाबोल आंदोलन केले त्यावेळी भडगाव येथील महावितरण कार्यालयात काही संशयित राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड करत अभियंता श्री.अजय धामोरे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यात कै. गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
परंतु घटना घडून तीन दिवस झाले तरीही गुन्हेगारांना अजून पर्यंत अटक झालेली नाही. तरी या घटनेच्या निषेदार्थ पाचोरा तालुक्यातील सकल धनगर समाजाने मा.प्रांताधिकारी श्री. राजेंद्रजी कचरे साहेब तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता मा.श्री. दस्कर साहेब यांना निषेधाचे निवेदन देत गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.तसेच लवकरात लवकर अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला. या प्रसंगी समाज बांधवांना विचारणा केली असता श्री.धामोरे धनगर समाजातील युवकांसाठी आदर्श असून शासनाच्या महावितरण कंपनीत ते निष्ठेने आपली सेवा बजावत असतांना आमचे समाजबांधव श्री. अजय धामोरे व इतर कर्मचारी यांना मारहाण करण्यात आली हे लोकशाहीसाठी घातक असून यांची ही ठोकशाही वागणूक योग्य नसल्याचे सांगत याठिकाणी झालेल्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले तसेच त्यात एका कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला तरी आंदोलकांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक पद्धतीने आंदोलन न करता नियोजित कट रचून अशा असंविधानिक पद्धतीने मोठ्या संख्येने महावितरण कार्यालय जबरदस्ती घुसून तोडफोड करून श्री. धामोरे साहेब यांच्यासह कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला तरी या गुन्हेगारी प्रवृत्तीतील संशयित राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण सकल धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करतील असे त्यांनी बोलतांना सांगितले.