शेतकरी मित्रहो आपण वेळीच एकत्र आलो नाही तर हे सरकार आपल्या चुलीत मुतल्याशिवाय राहणार नाही. संतोष पाटील.
दिनांक~२१/०३/२०२३
*शेतकरी मित्रहो*
*आपण वेळीच एकत्र आलो नाही तर*
*हे सरकार आपल्या चुलीत मुतल्याशिवाय राहणार नाही*
संतोष पाटील
————————————————–
शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आता अधिकच जटील होत चालले आहेत, शेतकऱ्यांचे खरे प्रश्न खऱ्या अडचणी समजून घेणारा एकही मायचा लाल राजकीय नेता नाही, गेल्या कित्येक वर्षापासून नवनवीन तंत्रज्ञान, रासायनिक बी बियाणे, खते व यांत्रिकीकरण यामुळे शेतीचा खर्च अधिकच वाढला आहे त्या पटीत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले नाही व आलेल्या पिकाला भाव मिळाला नाही, शासनाचे शेती विषयीचे चुकीचे ध्येय धोरण तसेच शेतीला सावत्रपणाची वागणूक देणे हे यामागचे खरे कारण आहे, सरकारातील लोकांच्या लक्षात एक गोष्ट पक्की आलेली आहे की शेतकरी हा संघटित नाही तो विखुरलेला आहे तो एकत्रीत पणे आपल्याशी लढू शकणार नाही आंदोलन करू शकणार नाही म्हणून या शेतकऱ्याला या लोकांनी दुर्लक्षित केलेला आहे, शेतकऱ्यांच्या लाईट बिलाचा प्रश्न, फसवी कर्जमाफी, तसेच अनेक कागदावरच राहिलेल्या कल्याणकारी योजना व शेतकऱ्याप्रती असलेली खोटी सहानुभूती अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत, कुठल्याच शेतीमालाला योग्य दर नाही उत्पन्न कमी आल्यानंतरही शासनाने हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडले, आता मार्च महिना येऊन गेला अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस जसाचा तसा पडलेला आहे, सावकाराचं, बँकेचं, पतसंस्थेचं कर्ज शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे त्या रकमेंचं व्याज भरमसाठ वाढत आहे, सुख दुःख लग्नकार्य असे अनेक प्रश्न आहेत पुढील हंगामासाठी शेतजमीन तयार करायचे दिवस जवळ आलेले आहेत एक प्रकारे हे सरकार गरीब शेतकऱ्यावर जुलम करत आहे तर दुसरीकडे व्यापारी व नोकरवर्ग, आमदार, खासदार राजकीय पुढाऱ्यांचे ठेकेदार कम कार्यकर्ते यांचे चोचले पुरवण्यात जमा झालेला सर्व पैसा खर्च करत आहे, मात्र या गरीब शेतकऱ्याला लुटण्याचे काम हे हुकूमशाहीने चालणारे सरकार करत आहे, दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्यावर अन्याय होतो आहे आपल्याला दिवस ढवळ्या लुटले जात आहे हे शेतकऱ्यांना माहीत असूनही शेतकरी एकत्र येत नाही, कुठल्या मोर्चात आंदोलनात उपोषणात भाग घेत नाही हा असंघटित असलेला शेतकरी जर संघटित झाला नाही तर एकेक करून मारला जाईल हे अगदी स्पष्ट दिसत आहे, संघटित कर्मचाऱ्यांचा संप आंदोलने यांना यश मिळून त्यांच्या मागण्या पूर्ण होतात मात्र शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून त्यांना न्याय मिळत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेल आहे, *या मस्तवाल राजकीय हेल्यांच्या टक्करीत शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान होत आहे* असे असतानाही एकही शेतकरी रस्त्यावर उतरत नाही एकत्र येत नाही व कुठल्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट नाही तर काय आहे, म्हणून शेतकरी बंधूंनो पुन्हा विनंती करतो आता तरी एकत्र या नाहीतर हे सरकार ,आपल्या चुलीत मुतून आपली चूल विझवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा….
संतोष पाटील
7666447112