पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास शिक्षणसंस्थेतील सात शिक्षकांच्या नियुक्त्यांवर संक्रांत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या एकुण ७ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शिक्षकांच्या नियुक्त्या बाबत तक्रारीवरुन शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी चौकशीअंती नुकताच दिला आहे. यामुळे त्या ७ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आली असून अजूनही ३२ शिक्षण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असल्याने त्यांच्यावरही अशीच कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी जोरदार चर्चा ऐकावयास मिळत असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष देविदास महाजन यांनी त्यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांच्या नियमित नियुक्त्या करुन कामावर हजर करुन घेतले होते. यांना कामावर हजर करुन घेतल्यानंतर संबंधित सुनील धनराज भुसारे, स्वप्नील भगवान पाटील, सविता रघुवीर बैनाडे, सिमा राजाराम महाजन, उज्वला एकनाथ पवार, समाधान राजमल पवार, भुषण अरुण येवले या सात शिक्षकांनी शासनचा पूर्ण पगारही घेतला होता. परंतु शिक्षकांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्या असल्याबाबतची तक्रार भोजे येथील सामाजिक कार्यकर्ते, अभियंता मा. श्री. निलेश उभाळे यांनी शिक्षण विभागासह राज्य सरकार व केंद्र सरकार प्रधानमंत्री कार्यालय, राष्ट्रपती भवन यांच्याकडे दाखल करुन चौकशी करुन कारवाई करण्याबाबत विनंती केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने शासन शुद्धिपत्रक २३ ऑगस्ट २०१७ च्या तरतुदीनुसार जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे व संबंधित शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडून सुनावणीसाठी नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात पुराव्यानिशी हजर राहण्यासाठी त्यांना लेखी स्वरुपात सांगितले होते. तदनंतर डॉ. बी. बी. चव्हाण शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी ठरलेल्या वेळेवर संबधितांचे म्हणणे एकुण घेत तक्रारदारांच्या तक्रारीनुसार चौकशी करुन चौकशीअंती निष्कर्ष काढले असता संबंधित शिक्षकांची नियुक्ती ही नियमबाह्य बिंदू नामावली व्यतिरिक्त व शासनाच्या आदेशानुसार न करता आदेशाचे उल्लंघन करुन कोणतेही निकष न लागता केली असल्याचे आढळून आले व तसे निष्पन्न झाले असल्याचे तसेच शासनाने सन २०१२ नंतर शिक्षक भरती बंद केली असतांनाही शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या केल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे शिक्षकांची नियुक्ती करतांना मर्जीतील शिक्षकांची भरती करणे सोपे जावे याकरिता शिक्षक नियुक्तीची जाहिरात प्रसिद्ध करतांना ही जाहिरात जास्त लोकांपर्यंत पोहचू नये असा धुर्त हेतू ठेवून मुद्दामहून कमी खपाच्या दैनिकात जाहिरात प्रकाशित करुन इच्छुक व लायक असलेल्या सुशिक्षित तरुणांची फसवणूक करुन दिशाभूल केली व गैरकृत्य करत शासनाचा पूर्ण पगार कसा दिला यासंदर्भात निट खुलासा देता आला नसल्याने फक्त उज्वला पवार वगळता सुनील भुसारे व प्रशांत पवार यांची वैयक्तिक मान्यता दिसून आली मात्र उर्वरित इतर शिक्षकांची वैयक्तिक मान्यता दिसून न आल्यामुळे व बिंदू नामावलीचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याचा ठपका ठेवून तसेच इतर अनेक प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत तसेच इतर टी. ई. टी. बोगस प्रमाणपत्र धारक शिक्षक दिसून आले असलो तक्रारदाराची तक्रार व म्हणणे रास्त असल्याचे नमूद करत शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सदरच्या नियुक्या रद्द करुन कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून याच संस्थेतील ३२ शिक्षक अजून कारवाईच्या रडारवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
***********************************************************
तक्रारदार अभियंता, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. निलेश उभाळे.
***********************************************************
वरील शिक्षण संस्थेच्या शिक्षक भरतीत मोठा घोटाळा झाला असून या भरतीची रीतसर पद्धतीने चौकशी होऊन संबंधितांवर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल करुन शासनाची फसवणूक करुन बेकायदेशीर घेतलेला पगार व निधी खर्च वसूल करण्यात येऊन संस्थेमध्ये झालेल्या इतरही नियमबाह्य व बेकायदेशीर भरतीची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.
आगे, आगे देखो होता है क्या ?
या शिक्षण संस्थेमध्ये ४३ पैकी ११ शिक्षकांच्या विरोधात अजून कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ३२ नियुक्त शिक्षक कारवाईच्या रडारवर.