प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पशुहत्या बंद ठेवण्याची जैन समाजातर्फे मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२४
प्रभु श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी तसेच जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरापैकी पाच तीर्थंकारांचे जन्मभूमी असलेल्या अयोध्या या पावन नगरीत येत्या २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी मंगलमय व आनंदी वातावरणात प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभर घराघराला तोरण बांधून, घराच्या छतावर भगवा फडकवून तसेच घराघरात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी तमाम जनतेला केले आहे.
तरी या दिवशी मुक्या प्राण्यांना सुध्दा आनंदाने जगण्याचा व खेळण्या, बागडण्याचा अधिकारी आहे. या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मिळून मुक्या प्राण्यांना सुध्दा (जिओ और जिने दो) हा मूलमंत्र घेऊन आनंदोत्सवात अजून भर पडावी म्हणून या दिवशी भारतभरातील सर्व अधिकृत, अनाधिकृत कत्तलखाने तसेच गावपातळीवर मांसविक्रीच्या व्यवसायासाठी केली जाणारी पशुहत्या बंद ठेवण्याची मागणी भारतातील संपूर्ण जैन समाजबांधवांच्या माध्यमातून करण्यात आली असून या आशयाचे निवेदन प्रत्येक तालुक्यातील जैन समाज बांधवांनी स्थानिक प्रशासन म्हणजे मा, तहसीलदार, मा. प्रांताधिकारी तसेच मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. प्रधानमंत्री दिल्ली, मा. राष्ट्रपती यांच्याकडे मेल, फॅक्स तसेच इतर माध्यमातून लवकरात, लवकर पाठवून आपल्या भावना कळवाव्यात असे आवाहन जैन संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले असून हा दिवस अहिंसा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी धुळे (कुसुंबा) येथील रहिवासी खान्देश जैन समाज क्षेत्राचे विश्वस्त, प्रसिध्दी प्रमुख व जेष्ठ पत्रकार सतिष वसंतीलाल जैन यांनी केली आहे.