नातेवाईकांनी दुर्लक्षित केलेल्या ७० वर्षीय आजीबाईंना माणुसकी समुहाने दिले जीवदान, उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात केले दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२३
(सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपचे मदतकार्य वाखाणण्याजोगे आहे.)
(इको गाडी विकत घेणे आहे. त्वरित संपर्क साधा
भ्रमणध्वनी क्रमांक ७४९९८०८६०४)
——————————————-
आपल्या घरातील स्त्री, माता, बहीण घरातून बाहेर गेल्यावर ती जर वेळेवर घरी परतली नाही व तिला थोडाही उशिर झाला तर आपला जीव कासाविस होतो. मात्र ती घरात सुखरूप परत आल्यानंतर आपली काळजी संपते व जीव भांड्यात पडतो. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत माय, माऊली सुरक्षित असते. असे असले तरीही सगेसोयरे, भाऊबंद, मुलेबाळे असा परिवार असतांनाही बऱ्याचशा महिला मग ती कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाच्या घरची सुन या सगळ्या रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली म्हणून आजही कित्येक माता, भगिनी रस्त्यावर एकट्या भटकंती करत असतांना दिसून येत आहेत.
नातगलगांचा गोतावळा असल्यावरही या माता, भगिनींना जेव्हा घरातील रक्ताच्या नात्यातील लोक काही ना काही कारणाने घर सोडण्यास भाग पाडतात किंवा त्यांना घरातून बहिष्कृत केले जाते तेव्हा त्यांच्या नशिबी येते ती दिशाहीन भटकंती मग ही भटकंती करतांना पोटाची भुख भागवण्यासाठी त्या आपले हात पुढे करुन रस्त्यावरुन भिक मागतांना दिसून येतात याच भटकंतीत मग नशिबाने काही मिळेल त्यावर गुजराण करतात. या लोकांना कोणीही स्विकारण्यासाठी पुढे येत नसल्याने दिवस मावळल्यानंतर पाय जेथे थांबतील तेथेच कधी उघड्यावर, कधी झाडाखाली तर कधी उन, वारा, पावसात आपल्या थकलेल्या शरीराला आराम देण्यासाठी त्या उघड्यावर निर्जनस्थळी आपला देह झोकून देतात. या परिस्थितीतही यापैकी काही महिलांवर अत्याचाराचे प्रसंग घडत आहेत. यातच या अनाथ रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांच्या नशीबी मातृत्व लावणाऱ्या समाजातील लबाड लांडग्यांचा शोध घेतला पाहिजे परंतु तसे घडत नाही.
तसेच आजच्या परिस्थितीत वृध्दाश्रमात दररोजच्या आकडेवारीत भर पडताना दिसून येत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अशीच एक नाछलगांच्या गोतावळ्यात असेलेली परंतु मुलांनी व सुनांनी इस्टेट घेऊन रस्त्यावर सोडून दिलेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे वयाच्या आजीबाई ह्या दिलीप जैन यांच्या घराजवळील गुराढोरांच्या गोठ्यापेक्षाही वाईट अवस्थेतल्या पडक्या घरामध्ये राहत आहेत. सकाळ झाली म्हणजे कोणाकडे तरी चहा मागायचा, कोणाकडे तरी भाकरी मागायची असे जीवन कंठत असलेल्या आजीबाई एके दिवशी प्रकृती खालावल्याने दुपारी अकरा वाजेच्या सुमारास भर उन्हात पडून होत्या ही बाब दिलीप जैन यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखा जैन यांनी दिलीय जैन यांच्या लक्षात आणून दिली. आजीबाईंची परिस्थी बिकट असल्याने दिलीप जैन यांनी त्यांच्या सुना, नातवंडांकडे परिस्थिती कथन केली व या आजीबाईंची व्यवस्था करण्यासाठी मदत मागितली तुम्ही दवाखान्यात घेऊन जा मी खर्च करतो असे सांगितले.
परंतु रक्ताच्या नात्यात असलेल्या एका नातवाने सरळ सांगितले की तिला मरु द्या आम्हाला काही सागू नका मेल्यावर ठेऊन देऊ असे उत्तर मिळाले तेव्हा ही घटना गल्लीबोळात माहिती झाल्यावर दिलीप मराठे, बापू मराठे व महिलांनी येऊन एका खाटीचा (बाजेचा) आधार घेऊन आजीबाईंवर सावली धरली. पुढे काय करायचे या विवंचनेत असतांनाच माणूसकी ग्रुपचे जिल्हाध्यक्ष उन, वारा, पाऊस, दिवस चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी धाऊन जाणारे सिंघम समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. गजानन क्षीरसागर यांन सदर महिलेची परिस्थिती कळवून मदतीसाठी काय करता येईल का म्हणून हाक दिली क्षणाचाही विलंब न करता मा. श्री. गजानन क्षीरसागर हे लोहारा येथून पंधरा किलोमीटर अंतर कापून लगेचच अंबे वडगाव येथे हजर झाले. अंबे वडगाव येथे आल्यानंतर त्यांनी या आजीबाईंचे नातेवाईक आहेत का अशी विचारणा केली असता या आजीबाईंचे नातेवाईक आहेत परंतु त्यांनी आजीबाईंना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे सांगितले तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मा. श्री. गजानन क्षीरसागर यांनी भ्रमणध्वनीवर नातेवाईकांशी संपर्क साधला असता तिकडून उडवाउडवीची उत्तरे देत आम्ही काहीच करु शकत नसल्याचे सांगितले.
हे उत्तर मिळताच मा. श्री. गजानन क्षीरसागर यांनी गावातील महिलांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने आजीबाईंना अंघोळ घातली कपडे बदलले व अधिक माहितीसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे व उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली व लगेचच १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाऊन घेत आजीबाईंना ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून पाचोरा नगरपरिषदेच्या दवाखान्यात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करुन जळगाव येथे रवाना केले. आजीबाईंना रुग्णवाहिकेतून नेण्यासाठी गाडीतून रवाना करतांना अंबे वडगाव गावातील व गल्लीतील मात, भगिनींच्या डोळ्यातून नकळत गंगा, यमुना वाहू लागल्या होत्या तसेच आजीबाईंच्या नातेवाईकांनी आजीबाईंना वाळीत टाकले म्हणून त्यांच्याबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली होती. या आजीबाईंना मदत करण्यासाठी दिलीप मराठे, जितू मराठे, बापू मराठे, भोला शळके व असंख्य महिलावर्गासह अनेक हात मदतीसाठी स्वताहून पुढे सरसावले होते.
———————————————————————
“एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला दिला न्याय”
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी समुहा शिवाय दुसरं काय असेल. ती महिला वयोवृद्ध आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? त्यांची शेतजमीन हिसकावून घेत त्यांना या उतारवयात वाऱ्यावर सोडून देण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेऊन व ती संपत्ती आपल्या नावावर करून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपली नाही का ? प्रश्न ह्या एका वयोवृद्ध आजीचा नाही, तर अजून समाजात हजारो निराधार महिला किती असतील. ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेसुध मिरवत असतील, समाजातील वाईट नजरे समोर मग
यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे आजी देखील आधी सामान्य जीवन जगत होते.जीवनात संकट सांगुन येत नसतात. तेव्हा त्यांना या वयात एकटे सोडू नका त्यांनी तुम्हाला जन्म देऊन गुन्हा केला आहे का ? आई वडिलांची संपत्ती लाटून व त्यांना बेगर करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मी सरकारला विनंती करतो आणि तेव्हाच समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.
—- समाजसेवक गजानन क्षीरसागर
——————————————
माणुसकी समुहाचे कार्य लाख मोलाचे..
मनोरुग्णांच्या किंवा निराधार जवळ देखील कोणी जायला तयार होत नाही. ते खूप सेन्सिटिव्ह असतात.कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात. परंतु समाजसेवक गजानन क्षीरसागर, सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्यांच्या सेवा ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. मनोरुग्णांसाठी ते स्वतः दाढी कटिंग व स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना माणसात आणतात व त्यांना हक्काचा निवारा मिळवून देतात. आज प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी त्यांना या वयोवृद्ध महिलेजवळ कोणी जवळही जाण्याची हिंमत करत नव्हते, त्याप्रसंगी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मोठे हिमतीने त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, समाजात अशी खूप कमी लोक आहेत की ते दुसऱ्यासाठी जगतात. आम्ही माणूसकी समूहाच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार व सदैव ऋणी आहोत.
—- दिलीप जैन..
सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार.
“मुलगा हवा की मुलगी”
(आजीबाईंकडे मुले, सुना, नातवंडांनी फिरवली पाठ, पण मुलगी धावत आली सुसाट.)
आजीबाईंची परिस्थीती पाहून व गावातच असलेले नातेवाईकांनी आजीबाईंना वाळीत टाकले म्हणून दिलीप जैन यांनी खडकी येथे रहात असलेल्या आजीबाईंच्या मुलीला व जावयाला भ्रमणध्वनी करुन सर्व हकीकत सांगितली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता काही वेळातच मुलगी आजीबाईंच्या जवळ हजर झाली असून ती आजही जळगाव येथील दवाखान्यात आजीबाईंची देखभाल करत आहे. म्हणून मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस करणारे तसेच गर्भलिंगनिदान करुन मुलगी नको म्हणणाऱ्यांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
“वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही गहिवरले”
आजीबाईंना १०८ रुग्णवाहिकेतून पाचोरा व जळगाव येथे नेतांना रुग्णवाहिका चालक स्वप्नील देवरे व डॉ. निलीमा पाठक तसेच पाचोरा येथे प्रथमोपचार करुन जळगाव येथे दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर आजपर्यंत आजीबाईंवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना आजीबाईंच्या सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर त्यांचेही डोळे पाणावले होते. सत्य परिस्थिती ऐकून व पाहून डॉक्टर व सहकारी कर्मचारी तन, मन, धन आर्ची घालून या आजीबाईंच्या उपचारासाठी अहोरात्र झटत आहेत.