‘खिचडी सरकार’ ला आम्हा शेतकऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा। आता तरी पूर्ण करा आम्हा शेतकऱ्यांच्या इच्छा ।। नाही तर शेतकरी व जनता निवडणुकीत देईल शिक्षा ||
रमेशचंद्रजी बाफणा.(कोल्हे ता. पाचोरा)
दिनांक~१०/०७/२०२३
‘खिचडी सरकार’ ला आम्हा शेतकऱ्यांच्या शुभेच्छा। आता तरी पूर्ण करा आम्हा शेतकऱ्यांच्या इच्छा ।। नाही तर शेतकरी व जनता निवडणुकीत देईल शिक्षा ||
१) कापसाला प्रति क्विंटल ५०००/०० रुपये अनुदान द्या. चालू खरीप हंगामातील कापसाची आधारभूत किंमत ९०००/०० रुपये क्विटंल जाहीर करून सी. सी. आय व पणन महासंघामार्फत ऑक्टोबर २०२३ मध्ये खरेदी केंद्रे सुरू करावी जेणे करून स्थानिक जिनींग प्रेसींगच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना रोजगार मिळेल.
२) नुकतेच केंद्र शासनाने खालील पिंकाचे जाहिर केलेले हमी भाव पुढील प्रमाणे आहेत. सोयाबीन ४६००रु., तुर ७०००रु., मका २०९०रु. सूर्यफूल ६७६० रु. प्रति क्विंटल. सदरच्या पिकांचा उत्पादन खर्च लक्षात घेता, सोयाबीन ७५०० रु. तुर ९००० रु., मका २७०० रु व सूर्यकुल ७५०० रु क्विटंल चा हमी भाव जाहिर त्यांची शासकीय यंत्रणेद्वारे खरेदी करण्यात यावी.
३) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व कुसूम सोलर कृषी पंप योजनेच्या माध्यमातू न मागेल त्याला सोलर पंप उपलब्ध करुन द्यावेत व विरोधी पक्षात असतांना मा. मुख्यमंत्री फडणविस साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे विज बिलाची थकबाकी पूर्णपणे माफ करावी, नाहीतरी शेतकऱ्यांना थकीत विजबिले भरणे शक्य नाही ही वास्तुस्थिती आहे.
४) मागेल त्याला शेततळे योजनेत पूर्वी ३०x३०x३ मीटर शेततळ्यासाठी १ लाख अनुदान मिळायचे नंतर ते अनुदान कमी करून ५०००० रु. व आता ७५००० रु. अनुदान दिले जाते, परंतु डिझेलच्या भाववाढीमुळे इतर खर्च वाढल्यामुळे कमीत-कमी १,५०,००० रु. अनुदान मिळणे क्रमप्राप्त ओह
५) पोकरा योजना संपूर्ण जळगांव जिल्हयासाठी लागू करावी. ६) कृषी यांत्रीकीकरण योजनेत ट्रक्टर व अवजारांसाठी ठिबकसिंचन
योजने प्रमाणे ८०% अनुदान द्यावे. ७) फळबाग लागवडी प्रमाणेच वनीकरण व बांधावर फळझाडे व इतर वृक्ष लागवडीसाठी १००% अनुदान द्यावे.
4) पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा हफ्ता म्हणून फक्त १रु-च भरावा लागणार आहे. त्याबद्दल राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन परंतु मागील वर्षी अतिवृष्ठी व सततचा पाऊस झाल्यावर सर्वर डाउन असल्यामुळे बहुसंख्य शेतकरी ऑनलाईन अर्ज भरु शकले नाही व ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरो त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होवून सुद्धा आजपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही त्याबाबतीत ला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती. धातुन
2) गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना अतिशय चांगली आहे, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. सदरच्या योजनेची व्याप्ती वाढवावी.
०) मध्यंतरी मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री यांनी जळगांव येथील कार्यक्रमात केळी महामंडळासाठी १०० कोरी मदत देण्याची घोषणा केली, परंतु वेळी महामंडळाची स्थापना झालीच नसल्याचे वृत्तपत्रातून एैकाडे. सदरचा निधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत केळी संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, पानवेली संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी दिल्यास शेतकरी व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. → नदीजोड प्रकल्पाची युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी.
सदरच्या मागण्या जास्त नसुन रास्त आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री एकटेच सदरच्या योजना यशस्वीपणे राबवित आहेत तर आपण तर तिघे (त्रिशुल ) मुख्यमंत्री पदाचे मानकरी आहात. त्यामुळे आपण हे सहज पार पाडू शकाल, याबद्दल आम्हाला खात्री आहे.
जयहिंद, जय महाराष्ट्र .
रमेशचंद्रजी बाफणा.